शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

आदिवासींबाबत सरकारी यंत्रणेचाही सकारात्मक दृष्टिकोन हवा

By admin | Updated: January 28, 2015 23:41 IST

प्रकाश आमटे : नाशिक भेटीत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले मत

अझहर शेख ल्ल नाशिकआदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात; मात्र सरकारी योजनांचा लाभ आदिवासींपर्यंत पोहचत नाही. परिणामी आजही देशात केवळ नऊ टक्के क्षेत्रावर वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाला मागासलेपणाचा सामना करावा लागत आहे, असे मत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक व ‘मॅगेसेसे’ पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.नाशिकच्या भेटीवर आलेले आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी उपनगर येथील फुलसुंदर इस्टेट परिसरात पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी पालिकेच्या खुल्या जागेत विकसित केलेल्या दुर्मीळ देशी वृक्षांच्या उद्यानाला भेट दिली. यावेळी आमटे म्हणाले, निसर्गाच्या सान्निध्यात जंगलात राहणारे आदिवासी नागरिक हेदेखील मनुष्यच आहेत; मात्र त्यांचा फारसा संबंध जगाशी येत नसल्यामुळे ते इतरांपेक्षा समाजाला वेगळे वाटतात. हे समाजाचे म्हणण्यापेक्षा आदिवासींचेच दुर्दैव म्हणावे लागेल. ते जगत असलेले जीवन बाबांनी बघितले व त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी स्वत:चे उभे आयुष्य झोकून दिले. त्यांचे संस्कार व कार्यातून प्रेरणा घेत मी व मंदा त्यांचाच वारसा जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचे आमटे यांनी सांगितले. आदिवासीदेखील या देशाचा नागरिक असून, त्यालादेखील इतर मनुष्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे; मात्र त्याचा संपर्क जंगलाबाहेरच्या जगाशी येत नसल्याने ते इतरांपेक्षा वेगळे जीवन जगत आहेत. राग येणे हा सजीवाचा गुणधर्मच आहे. असाच राग हा आदिवासींनादेखील येतो व ते रागाच्या भरात येऊन काही तरी वेगळे करण्याचे धाडस दाखवतात आणि त्यांच्या हातून गुन्हा घडतो; मात्र त्या आदिवासींना त्याची कल्पना नसते. सरकारी यंत्रणेची धुरा सांभाळणाऱ्या ‘सुज्ञ’ नोकरदारवर्गाने जर त्यांना समजून घेतले तर कदाचित परिस्थिती बदललेली पाहावयास मिळेल. नोकरदारवर्गाच्या नकारात्मक दृष्टिकोनातून वागण्यामुळे सरकारी यंत्रणेवर त्यांचा रोष आहे. सरकारी नोकरदारांनी आदिवासींना समजून घेत त्यांच्याविषयी सकारात्मक राहून आपले कर्तव्य पार पाडल्यास आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.