शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

आदिवासींबाबत सरकारी यंत्रणेचाही सकारात्मक दृष्टिकोन हवा

By admin | Updated: January 28, 2015 23:41 IST

प्रकाश आमटे : नाशिक भेटीत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले मत

अझहर शेख ल्ल नाशिकआदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात; मात्र सरकारी योजनांचा लाभ आदिवासींपर्यंत पोहचत नाही. परिणामी आजही देशात केवळ नऊ टक्के क्षेत्रावर वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाला मागासलेपणाचा सामना करावा लागत आहे, असे मत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक व ‘मॅगेसेसे’ पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.नाशिकच्या भेटीवर आलेले आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी उपनगर येथील फुलसुंदर इस्टेट परिसरात पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी पालिकेच्या खुल्या जागेत विकसित केलेल्या दुर्मीळ देशी वृक्षांच्या उद्यानाला भेट दिली. यावेळी आमटे म्हणाले, निसर्गाच्या सान्निध्यात जंगलात राहणारे आदिवासी नागरिक हेदेखील मनुष्यच आहेत; मात्र त्यांचा फारसा संबंध जगाशी येत नसल्यामुळे ते इतरांपेक्षा समाजाला वेगळे वाटतात. हे समाजाचे म्हणण्यापेक्षा आदिवासींचेच दुर्दैव म्हणावे लागेल. ते जगत असलेले जीवन बाबांनी बघितले व त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी स्वत:चे उभे आयुष्य झोकून दिले. त्यांचे संस्कार व कार्यातून प्रेरणा घेत मी व मंदा त्यांचाच वारसा जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचे आमटे यांनी सांगितले. आदिवासीदेखील या देशाचा नागरिक असून, त्यालादेखील इतर मनुष्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे; मात्र त्याचा संपर्क जंगलाबाहेरच्या जगाशी येत नसल्याने ते इतरांपेक्षा वेगळे जीवन जगत आहेत. राग येणे हा सजीवाचा गुणधर्मच आहे. असाच राग हा आदिवासींनादेखील येतो व ते रागाच्या भरात येऊन काही तरी वेगळे करण्याचे धाडस दाखवतात आणि त्यांच्या हातून गुन्हा घडतो; मात्र त्या आदिवासींना त्याची कल्पना नसते. सरकारी यंत्रणेची धुरा सांभाळणाऱ्या ‘सुज्ञ’ नोकरदारवर्गाने जर त्यांना समजून घेतले तर कदाचित परिस्थिती बदललेली पाहावयास मिळेल. नोकरदारवर्गाच्या नकारात्मक दृष्टिकोनातून वागण्यामुळे सरकारी यंत्रणेवर त्यांचा रोष आहे. सरकारी नोकरदारांनी आदिवासींना समजून घेत त्यांच्याविषयी सकारात्मक राहून आपले कर्तव्य पार पाडल्यास आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.