शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

शासन निर्णय : अधिकारांमध्ये होणार वाढ; ग्रामसभेचे वाढविले अधिकार

By admin | Updated: July 4, 2017 00:52 IST

थेट सरपंच निवडीचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीनंतर आता सरपंचही जनतेतून निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, राज्य सरकार यासंदर्भात लवकरच वटहुकूम काढून कायदा मंजूर केला जाणार आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.कळवण : येत्या सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींसाठी थेट जनतेमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच ग्रामविकास विभाग कायद्यातील बदल अंमलात यावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करत आहे. यातील बदल लक्षात घेऊन गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या ग्रामविकास कायद्यातदेखील सुधारणा करून राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच जनतेमधून निवडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. जनतेमधून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाच्या अधिकारांमध्येही राज्य सरकारने वाढ केली असून, गावाचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरपंचाला देण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामसभा अर्थसंकल्प मंजूर करेल. यासाठी ग्रामसभेचे अधिकारही वाढविण्यात आले आहेत. जनतेमधून निवडला जाणारा सरपंच सातवी उत्तीर्ण असावा, अशी निवडणुकीसाठी पात्रता ठरविण्यात आली असून, १९९५नंतर जन्म झालेल्या इच्छुकांसाठीच ही अट लागू असून, १९९५ पूर्वी जन्मलेल्यांना ही अट लागू नसणार आहे. आतापर्यंत सरपंचाची निवडप्रक्रिया ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली राबविली जात होती. सरपंचपदासाठी अर्ज मागवले जात होते. ग्रामसेवक नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावून त्यात सरपंचपदासाठीच्या अर्जावर मतदान घेत होते.