शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

शासन निर्णय : अधिकारांमध्ये होणार वाढ; ग्रामसभेचे वाढविले अधिकार

By admin | Updated: July 4, 2017 00:52 IST

थेट सरपंच निवडीचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीनंतर आता सरपंचही जनतेतून निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, राज्य सरकार यासंदर्भात लवकरच वटहुकूम काढून कायदा मंजूर केला जाणार आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.कळवण : येत्या सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींसाठी थेट जनतेमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच ग्रामविकास विभाग कायद्यातील बदल अंमलात यावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करत आहे. यातील बदल लक्षात घेऊन गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या ग्रामविकास कायद्यातदेखील सुधारणा करून राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच जनतेमधून निवडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. जनतेमधून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाच्या अधिकारांमध्येही राज्य सरकारने वाढ केली असून, गावाचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरपंचाला देण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामसभा अर्थसंकल्प मंजूर करेल. यासाठी ग्रामसभेचे अधिकारही वाढविण्यात आले आहेत. जनतेमधून निवडला जाणारा सरपंच सातवी उत्तीर्ण असावा, अशी निवडणुकीसाठी पात्रता ठरविण्यात आली असून, १९९५नंतर जन्म झालेल्या इच्छुकांसाठीच ही अट लागू असून, १९९५ पूर्वी जन्मलेल्यांना ही अट लागू नसणार आहे. आतापर्यंत सरपंचाची निवडप्रक्रिया ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली राबविली जात होती. सरपंचपदासाठी अर्ज मागवले जात होते. ग्रामसेवक नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावून त्यात सरपंचपदासाठीच्या अर्जावर मतदान घेत होते.