शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गाळप नियोजनाचा सरकारी ‘घंटा’नाद

By admin | Updated: October 1, 2015 22:51 IST

गाळप नियोजनाचा सरकारी ‘घंटा’नाद

  नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन केलेले असले, तरी प्रत्यक्षात गाळपासाठी लागणारा ऊस तोडणारे कामगारच १५ आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध होण्याबाबत सांशकता असल्याने सरकारचे ऊस गाळपाचे नियोजन कोलमडणार आहे. बहुतांश कारखान्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत ऊस गाळप सुरू करण्याची विनंती सरकारकडे करण्याची तयारी केली आहे. त्यातच गाळपासाठी शासनाच्या अटी, स्वाभिमानी संघटनेचा २११७ हमीभावाचा उसाच्या दांड्याचा ‘बुडखा’, कारखान्यांची आर्थिक हतबलता याची जोड नियोजन कोलमडण्यास पुरेशी ठरणार आहे.पावसाने दाखविलेला हात, जोडीला दुष्काळाची साथ, या पार्श्वभूमीवर उसाची कमी क्षेत्रावर झालेली लागवड, ऊसतोड कामगारांना किमान महिन्याआधी द्यावी लागणारी अ‍ॅडव्हॉन्सची रक्कम, तोंडावर आलेली दिवाळी या सर्व पार्श्वभूमीवर १५ आॅक्टोबरपासून ऊस गाळपाचा हंगाम सुरू तरी कसा करणार, असा मोठा प्रश्न साखर कारखानदारांपुढे ‘आ’वासून उभा राहिला आहे.  नाशिकचा विचार करता उसाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र हे ३५ ते ३८ हजाराच्या आसपास असताना यावर्षी पूर्वहंगामी, खोडवा व आडसाली उसाचे लागवडीचे सरासरी क्षेत्र १८ हजार ४०० हेक्टरवर मर्यादित राहिले आहे. शिखर बॅँकेच्या आवळलेल्या आर्थिक नाड्या आणि त्यावर आलेली प्रशासकीय राजवट पाहता, यंदाच्या हंगामात जिल्हा बॅँकांनी तोट्यातील आणि अडचणीतील साखर कारखान्यांना कर्ज देण्यास दाखविलेला नकारघंटा, त्यामुळे बंद पडलेले साखर कारखाने आणि उसाचे घटलेले क्षेत्र या अनेक अडचणींचा सामना करून साखर कारखान्यांना १५ आॅक्टोबर हा ऊस गाळपाचा मुहूर्त गाठणे त्यामुळेच अशक्यप्राय झाले आहे. मुळातच आधीच गाळपाच्या नियोजनाबाबत कालमर्यादा ठरविणे म्हणजे सर्व काही आलबेल असल्याच्या भरवशावर केलेले नियोजन म्हटले, तर सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिलेली पर्जन्यमानाची सरासरी आणि २११७ रुपये उसाला हमीभाव देण्याची सक्ती, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उचललेला दंडुका पाहता ऊस उत्पादकच नव्हे, तर साखर कारखान्यांनाही १५ आॅक्टोबरचा गाळपाचा मुहूर्त न पेलवणारा आहे. याउलट साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरच्या पुढे गाळप सुरू करण्याची केलेली विनंतीच सरकारी नियोजनाला खो देणारी ठरली आहे.