शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

गाळप नियोजनाचा सरकारी ‘घंटा’नाद

By admin | Updated: October 1, 2015 22:51 IST

गाळप नियोजनाचा सरकारी ‘घंटा’नाद

  नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन केलेले असले, तरी प्रत्यक्षात गाळपासाठी लागणारा ऊस तोडणारे कामगारच १५ आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध होण्याबाबत सांशकता असल्याने सरकारचे ऊस गाळपाचे नियोजन कोलमडणार आहे. बहुतांश कारखान्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत ऊस गाळप सुरू करण्याची विनंती सरकारकडे करण्याची तयारी केली आहे. त्यातच गाळपासाठी शासनाच्या अटी, स्वाभिमानी संघटनेचा २११७ हमीभावाचा उसाच्या दांड्याचा ‘बुडखा’, कारखान्यांची आर्थिक हतबलता याची जोड नियोजन कोलमडण्यास पुरेशी ठरणार आहे.पावसाने दाखविलेला हात, जोडीला दुष्काळाची साथ, या पार्श्वभूमीवर उसाची कमी क्षेत्रावर झालेली लागवड, ऊसतोड कामगारांना किमान महिन्याआधी द्यावी लागणारी अ‍ॅडव्हॉन्सची रक्कम, तोंडावर आलेली दिवाळी या सर्व पार्श्वभूमीवर १५ आॅक्टोबरपासून ऊस गाळपाचा हंगाम सुरू तरी कसा करणार, असा मोठा प्रश्न साखर कारखानदारांपुढे ‘आ’वासून उभा राहिला आहे.  नाशिकचा विचार करता उसाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र हे ३५ ते ३८ हजाराच्या आसपास असताना यावर्षी पूर्वहंगामी, खोडवा व आडसाली उसाचे लागवडीचे सरासरी क्षेत्र १८ हजार ४०० हेक्टरवर मर्यादित राहिले आहे. शिखर बॅँकेच्या आवळलेल्या आर्थिक नाड्या आणि त्यावर आलेली प्रशासकीय राजवट पाहता, यंदाच्या हंगामात जिल्हा बॅँकांनी तोट्यातील आणि अडचणीतील साखर कारखान्यांना कर्ज देण्यास दाखविलेला नकारघंटा, त्यामुळे बंद पडलेले साखर कारखाने आणि उसाचे घटलेले क्षेत्र या अनेक अडचणींचा सामना करून साखर कारखान्यांना १५ आॅक्टोबर हा ऊस गाळपाचा मुहूर्त गाठणे त्यामुळेच अशक्यप्राय झाले आहे. मुळातच आधीच गाळपाच्या नियोजनाबाबत कालमर्यादा ठरविणे म्हणजे सर्व काही आलबेल असल्याच्या भरवशावर केलेले नियोजन म्हटले, तर सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिलेली पर्जन्यमानाची सरासरी आणि २११७ रुपये उसाला हमीभाव देण्याची सक्ती, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उचललेला दंडुका पाहता ऊस उत्पादकच नव्हे, तर साखर कारखान्यांनाही १५ आॅक्टोबरचा गाळपाचा मुहूर्त न पेलवणारा आहे. याउलट साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरच्या पुढे गाळप सुरू करण्याची केलेली विनंतीच सरकारी नियोजनाला खो देणारी ठरली आहे.