शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आगर टाकळीच्या गोमय मारुती मंदिरात भक्तांचा अखंड ओघ

By admin | Updated: April 11, 2017 01:44 IST

नाशिक : समर्थ रामदास स्वामी यांनी आगर टाकळी येथे स्थापन केलेल्या गोमय मारुती मंदिराचे पावित्र्य आजही कायम असून, मूळ ढाच्याला कोणताही हात न लावता जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.

नाशिक : समर्थ रामदास स्वामी यांनी आगर टाकळी येथे स्थापन केलेल्या गोमय मारुती मंदिराचे पावित्र्य आजही कायम असून, मूळ ढाच्याला कोणताही हात न लावता जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात असून, मंदिराला या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून, सुमारे पावणे चारशे वर्षांपूर्वीच्या या मंदिरात भक्ताचा दर्शनासाठी अखंड ओघ सुरूच आहे. दरम्यान, भक्तांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या सोडण्याची मागणी होत आहे. श्री क्षेत्र नाशिकनजिक नंदिनी गोदावरीच्या संगमावर असलेल्या आगर टाकळी येथे इ.स. १६२0 मध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली तसेच १३ कोटी रामनामाचा जप केलेल्या मारुतीराय त्यांना प्रसन्न झाले. त्यानंतर १६३३ मध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी समर्थ रामदासांनी गोमय म्हणजे शेणाच्या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. पहिले मठाधिपती हणून उद्धवस्वामी यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून आजतागायत या गोमय मारुतीचे पावित्र्य जसेच्या तसे जपून ठेवण्यात आले आहे. देवस्थानच्या देखभालीसाठी इ.स. १७५३ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी तत्कालीन मठाधिपती भीमा स्वामी यांना टाकळी गावासह २00 एकर जमिनीची सनद देवस्थानाला अर्पण केली होती. सध्या गोमय मारुती मंदिराचा कारभार श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ या ट्रस्टद्वारे पाहण्यात येत आहे. ट्रस्टच्या वतीने रथसप्तमी, दासनवमी, श्रीरामनवमी आणि श्री हनुमान जन्मोत्सव हे उत्सव साजरे करण्यात येतात. सध्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या तसेच शहर बसची व्यवस्था करावी तसेच येथे येणारी नाशिक दर्शन बस पूर्ववत सुरू करावी, अशी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी सुधीर शिरवाडकर, अ‍ॅड. दिलीप कैचे, ज्योतीराव खैरनार, अ‍ॅड. प्रकाश पवार आदिंनी केली आहे.