शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

गोदा पाय ठेवण्यायोग्य नाही, स्नान कसे करू?

By admin | Updated: January 13, 2015 00:34 IST

श्री श्री रविशंकर : ‘वेणुनाद’ कार्यक्रमात सवाल; आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक करणार स्वच्छता

नाशिक : प्रदूषणामुळे गोदावरी पाय ठेवण्यायोग्य राहिलेली नसताना, त्यात स्नान करण्याचा विचार कसा करू, असा सवाल आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित केला. आठ महिन्यांत मंगळावर पोहोचता येते, तर नद्यांची स्वच्छता होऊ शकत नाही का, असे विचारत त्यांनी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व नागरिकांना नद्यांची तातडीने स्वच्छ करण्याचे आवाहन केले. आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक या कार्यात पुढाकार घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने पंचवटीतील साधुग्राम मैदानावर विश्वविक्रमी ‘वेणुनाद’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, बासरीत कचरा असेल, तर ती नीट वाजत नाही. नाशकातील कुंभमेळा आठ महिन्यांवर आला असताना, गोदावरी, कपिला व नासर्डी या तिन्ही नद्या प्रचंड प्रदूषित झाल्या आहेत. नासर्डीचा तर अक्षरश: नालाच झाला आहे. शहर व जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर व महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन आपत्कालीन स्थितीच्या वेगाने या नद्यांची स्वच्छता मोहीम राबवावी. आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवकही यात पुढाकार घेतील. प्रशासनाने गोदावरीला मिळणारे सगळे नाले एकतर बंद करावेत किंवा पाइपच्या सहाय्याने ते अन्यत्र वळवावेत. या नद्या स्वच्छ झाल्या, तरच कुंभमेळ्यात साधू-महंत नदीत स्नान करू शकतील. लोकप्रतिनिधींनी तपश्चर्या समजून हे कार्य सिद्धीस न्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी जलस्वच्छतेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, जलस्रोत स्वच्छ झाल्यास माणसांचे आरोग्य चांगले राहते, विचारही स्वच्छ होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच रसायनमुक्त शेती करा, प्लास्टिक जाळू नका, त्यातून कॅन्सरसारखे रोग उद्भवतात, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला आमदार तथा माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, आमदार पंकज भुजबळ, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)