शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

गोदावरीचे घाट रामभरोसे, कोट्यवधींचा निधी पाण्यात

By admin | Updated: February 4, 2017 13:35 IST

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची स्नानासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च करून टाळकुटेश्वर ते थेट दसकपर्यंत नदीपात्रात काँक्रीटचे घाट बांधले.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 4 - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची स्नानासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च करून टाळकुटेश्वर ते थेट दसकपर्यंत नदीपात्रात काँक्रीटचे घाट बांधले. कुंभमेळा होऊन वर्षभराचा कालावधी लोटला असून या घाटांची दुरवस्था वाढली आहे. प्रशासनाने घाटांचा ‘घाट’ घातला; मात्र पुढील कुंभमेळ्यापर्यंत घाट शाबूत राहतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 
महापालिका व जिल्हा प्रशासनाने वर्षभरापूर्वी गोदा प्रदूषणमुक्तीचा गवगवा केला होता. सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्थानिक मराठी कलावंतांपासून तर गोदाप्रेमींपर्यंत सर्वांकडून गोदा प्रदूषणमुक्तीचा सूर आळवला जात आहे. एकीकडे गोदा प्रदूषणमुक्तीचा नारा दिला जात असताना दुसरीकडे गोदापात्रातील काँक्रीट घाटांची होणा-या दैनावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. 
 
सदर घाट जिल्हा प्रशासनाने देखभाल दुरूस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत; मात्र  या घाटांची देखभाल करण्यामध्ये महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. घाटांची दुर्दशा वाढीस लागत असून काही ठिकाणी घाटांचा वापर हगणदारीसाठी केला जात आहे. 
 
घाट बांधणीला पर्यावरणप्रेमींचा होता विरोध
काँक्रीट घाट बांधणीला त्यावेळी काही पर्यावरणप्रेमी संस्थांकडून आक्षेप घेण्यात आला होता. गरज नसतानाही सरसकट दहा ते बारा किलोमीटरपर्यंत काँक्रीट नदीपात्रात ओतून घाट बांधल्यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत धोक्यात आल्याचा दावा त्यावेळी आपलं पर्यावरण संस्थेने केला होता. या घाटांचे काम थांबवावे अथवा अखंड घाट बांधणे टाळावे, यासाठी मानवी साखळीच्या रुपाने या संस्थेने आंदोलनही त्यावेळी पुकारले होते. 
 
खासदार गोडसेंनाही पडला विसर
खासदार हेमंत गोडसे यांनी घाटांची पाहणी करुन या घाटांच्या मध्यभागी टप्प्याटप्प्यांवर सुशोभीकरण करून गोदा पर्यटनाची संकल्पना विकसीत करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी पाहणी दौ-याप्रसंगी सांगितले होते; मात्र कुंभमेळा होऊन वर्षभराचा कालावधी उलटूनदेखील अद्याप या घाटांचे नवनिर्माण महापालिका किंवा राज्य सरकारमार्फत होऊ शकलेले नाही. गोडसे यांच्याकडूनही अद्याप याबाबत कुठल्याही प्रकारे शासनदरबारी याप्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला नाही.
 
महापूराचा जोरदार फटका
गेल्या वर्षी पावसाळ्यात महापूराचा जोरदार फटका नाशिकला बसला. त्यावेळी हे सर्व घाट आठवडाभरापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पाण्याखाली बुडालेले होते यामुळे घाटांची रया गेली. काँक्रीट घाटांमुळे गोदामाईचा श्वास आवळला गेल्याने गोदामाई कोपली व पुराच्या पाण्याने उसळी घेऊन धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीपात्राचा विस्तारही वाढल्याचे महापूरामध्ये नाशिककरांनी याचि देही याचि डोळा बघितल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात आले होते.
 
सध्या घाटांची दुर्दशा
महापालिके कडे सोपविण्यात आलेल्या कोट्यवधींच्या नवीन घाटांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पेलण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. घाटांची ‘माती’ होत असून घाटांचे सुशोभिकरण तर लांब राहिले; मात्र साधी स्वच्छतादेखील केली जात नसल्याने घाट रामभरोसे आहे.