शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:17 IST

कोट- नोटबंदी, गारपीट, कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे मागील पाच वर्षांपासून राज्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत. पंजाबात वीज ...

कोट-

नोटबंदी, गारपीट, कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे मागील पाच वर्षांपासून राज्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत. पंजाबात वीज बिल माफीचा निर्णय महाराष्ट्रातही काँग्रेसने राबवावा आणि राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - कैलास भोसले, कोषाध्यक्ष , राज्य द्राक्ष बागायतदार संघ

कोट-

पंजाबात पाच-सहा महिन्यांनी निवडणुका आहेत. यामुळे काँग्रेसने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातही शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी वीज बिल माफीची घोषणा केली होती पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. कोणताही राजकीय पक्ष असो तो शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांची मते पदरात पाडून घेत असतो. काँग्रेसने महाराष्ट्रातही तो निर्णय राबवावा. - शंकर पुरकर, जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष

कोट-

महाराष्ट्रात राज्य सरकारने यापूर्वीच वीज बिल माफीचा निर्णय घ्यायला हवा होता. महाराष्ट्रात काँग्रेसकडे ऊर्जा खाते असल्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करावी - शिवाजी म्हस्के, शेतकरी, पळसे

कोट-

महाराष्ट्रात शेकडा एक ते दोन टक्के शेतकरी सधन आहेत. उर्वरित शेतकरी सर्वसामान्य असून अनेकांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असतो. नुकसान झाले तर त्यांच्या अडचणीत वाढ होत असते. यासाठी महाराष्ट्रातही शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा - शिवराम गायधनी, संचालक, नाशिक हनीबी फार्म्स प्रोड्युसर कं.

कोट-

महाराष्ट्रात राजकीय स्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे असून सरकारमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. यामुळे काँग्रेसला निर्णय घेताना अडचणी जरी आल्या तरी प्रसंगी काँग्रेसने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन हा दबदबा झुगारून वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा द्यावा व हा निर्णय महाराष्ट्रातही लागू करायला हवा. - शिवनाथ जाधव, प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना

(सर्व फोटो नावाने दिलेले आहेत. )