शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतकऱ्यांना पीककर्ज, ठेवीदारांना तत्काळ पैसे द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:19 IST

नाशिक : नियमित कर्जफेड करूनही अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना पीककर्ज मिळत नाही, ठेवीदारांच्या हक्काचे पैसे बॅँकेत गुंतविलेल्यांना अडचणीच्या काळात मदत मिळत नाही, पैसे काढून देण्यासाठी बॅँक कर्मचाºयांकडून पैशांची मागणी केली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारी करीत शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. त्यावर बॅँकेने राज्य बॅँक व नाबार्डकडे सहाशे कोटी कर्जाचा प्रस्ताव पाठविला असून, राज्य बॅँकेने सकारात्मकता दर्शविल्याने लवकरच शेतकºयांना कर्जपुरवठा करण्याची ग्वाही अध्यक्ष केदा अहेर यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा बॅँक सभा : खातेदारांचा संचालकांना तगादा

नाशिक : नियमित कर्जफेड करूनही अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना पीककर्ज मिळत नाही, ठेवीदारांच्या हक्काचे पैसे बॅँकेत गुंतविलेल्यांना अडचणीच्या काळात मदत मिळत नाही, पैसे काढून देण्यासाठी बॅँक कर्मचाºयांकडून पैशांची मागणी केली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारी करीत शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. त्यावर बॅँकेने राज्य बॅँक व नाबार्डकडे सहाशे कोटी कर्जाचा प्रस्ताव पाठविला असून, राज्य बॅँकेने सकारात्मकता दर्शविल्याने लवकरच शेतकºयांना कर्जपुरवठा करण्याची ग्वाही अध्यक्ष केदा अहेर यांनी दिली.जिल्हा बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जुन्या कार्यालयात घेण्यात येऊन सभासदांनी विषय पत्रिकेवरील तेरा विषयांना एकमुखी मंजुरी दिली. आयत्या वेळच्या विषयात मात्र सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करताना बॅँकेच्या कारभाºयांना धारेवर धरले. सन २०१६-१७ च्या थकबाकीदारांचे कर्जमाफ करा तसेच वसुलीसाठी पाठविण्यात आलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, अशी मागणी करून शासनाकडून बोंडअळीचे अनुदान मिळूनही बॅँकेकडून ते शेतकºयांना दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. बॅँकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्जाची नियमित परतफेड करणाºया सभासदांना पीककर्ज नाकारून अन्याय केला जात असल्याची भावना विजय गांगुर्डे यांनी व्यक्त केली. नोटाबंदीमुळे पतसंस्थेच्या ठेवी बॅँकेत अडकून पडल्या असून, त्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शांतीलाल अहिरे यांनी केली तर मोठ्या कर्जदारांना बोलावून त्यांच्याकडून वन टाइम सेटलमेंट करून कर्जवसुली करावी, कर्जवसुलीतून कर्जपुरवठा करण्यात यावा, सोसायट्यांच्या शेअरच्या रक्कमेवर व्याज द्यावे, माजी सैनिकांचे अडकलेले पैसे परत करा आदी मागण्या मांडण्यात आल्या. बॅँकेतून रक्कम काढून देण्यासाठी खातेदारांकडून दोन दोन हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रारीही यावेळी करण्यात आली.नोटाबंदीमुळे बॅँक आर्थिक अडचणीततासभर चाललेल्या या सभेत सभासदांच्या शंकाचे शिरीष कोतवाल यांनी समाधान केले त्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी, बॅँकेचे देणे फेडून सुमारे ९०० ते १००० कोटी रुपये शिल्लक राहतील अशी सध्याची परिस्थिती असून, कर्जमाफी, नोटाबंदीच्या धोरणामुळे बॅँक सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. परंतु लवकरच अशा परिस्थितीतून ती बाहेर पडेल. राज्य बॅँकेने ६०० कोटींचा कर्जपुरवठा केल्यास नियमित कर्जफेड करणाºयांना प्राधान्यांने कर्जपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. या बैठकीस सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.