शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषय वगळण्याचा घाट

By admin | Updated: September 21, 2016 00:11 IST

शिक्षकांकडून विरोध : वैज्ञानिक संकल्पनाही होणार कमी

नाशिक : विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया मानला जात असतानाही तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषयाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकारास विज्ञान शिक्षकांकडून तीव्र विरोध केला जात असला तरी अद्यापही महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. नव्या शिक्षणप्रणालीतून विज्ञानच्या अनेक शाखांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, राज्यभरातून त्याविरोधात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्डाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. या बोर्डाकडून दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करून त्यास सुसंगत आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार सन २०१७/१८ पासून सुधारित ‘आय’ अभ्यासप्रणाली लागू करण्यात येणार आहे. मात्र या अभ्यासप्रणातील विज्ञान शाखेचे महत्त्व कमी करण्यात आल्याचा आरोप विज्ञान शिक्षकांकडून होत आहे.नवीन अभ्यासक्रम प्रणालीत विज्ञान हा विषय जो आजवर सर्व तंत्रनिकेतन शाखेसाठी प्रथम आणि द्वितीय सत्रात शिकविला जात होता तो मार्यादित करण्यात आला आहे. सदर विषय आता केवळ प्रथम सत्र म्हणजे सहा महिनेच शिकविण्यात येणार असून, उर्वरित सहा महिने संगणक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेसाठी देण्यात आले आहेत. तसेच विज्ञानाचे काही घटक हे इतर तांत्रिक विषयांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या निर्णयाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया असल्याने सदर विषय पदविका अभ्यासक्रमातून कमी करू नये, अशी भूमिका तज्ज्ञांनी घेतली आहे. त्यांच्या मते आजवर पदविका अभ्यासक्रमात विज्ञान समाविष्ट असणे हे त्या विषयाचे महत्त्व स्पष्ट करणारे आहे. एका बाजूला केंद्र सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक शिक्षणाचे महत्त्व व तंत्रज्ञानाची स्वप्ने दाखवित असताना महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्ड विज्ञानचे महत्त्व कमी करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेली २५ ते ३० वर्ष विज्ञान विषय अभ्यासक्रम असताना अचानकपणे ते वगळण्यात येऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. विज्ञान हा विषय दोन्ही सत्रात ठेवून विद्यार्थ्यांचे सामान्य विज्ञान व वैज्ञानिक संज्ञा पक्के करून त्यानंतरच त्यावर आधारित तांत्रिक विषय शिकविल्यास विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)