शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषय वगळण्याचा घाट

By admin | Updated: September 21, 2016 00:11 IST

शिक्षकांकडून विरोध : वैज्ञानिक संकल्पनाही होणार कमी

नाशिक : विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया मानला जात असतानाही तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषयाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकारास विज्ञान शिक्षकांकडून तीव्र विरोध केला जात असला तरी अद्यापही महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. नव्या शिक्षणप्रणालीतून विज्ञानच्या अनेक शाखांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, राज्यभरातून त्याविरोधात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्डाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. या बोर्डाकडून दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करून त्यास सुसंगत आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार सन २०१७/१८ पासून सुधारित ‘आय’ अभ्यासप्रणाली लागू करण्यात येणार आहे. मात्र या अभ्यासप्रणातील विज्ञान शाखेचे महत्त्व कमी करण्यात आल्याचा आरोप विज्ञान शिक्षकांकडून होत आहे.नवीन अभ्यासक्रम प्रणालीत विज्ञान हा विषय जो आजवर सर्व तंत्रनिकेतन शाखेसाठी प्रथम आणि द्वितीय सत्रात शिकविला जात होता तो मार्यादित करण्यात आला आहे. सदर विषय आता केवळ प्रथम सत्र म्हणजे सहा महिनेच शिकविण्यात येणार असून, उर्वरित सहा महिने संगणक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेसाठी देण्यात आले आहेत. तसेच विज्ञानाचे काही घटक हे इतर तांत्रिक विषयांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या निर्णयाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया असल्याने सदर विषय पदविका अभ्यासक्रमातून कमी करू नये, अशी भूमिका तज्ज्ञांनी घेतली आहे. त्यांच्या मते आजवर पदविका अभ्यासक्रमात विज्ञान समाविष्ट असणे हे त्या विषयाचे महत्त्व स्पष्ट करणारे आहे. एका बाजूला केंद्र सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक शिक्षणाचे महत्त्व व तंत्रज्ञानाची स्वप्ने दाखवित असताना महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्ड विज्ञानचे महत्त्व कमी करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेली २५ ते ३० वर्ष विज्ञान विषय अभ्यासक्रम असताना अचानकपणे ते वगळण्यात येऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. विज्ञान हा विषय दोन्ही सत्रात ठेवून विद्यार्थ्यांचे सामान्य विज्ञान व वैज्ञानिक संज्ञा पक्के करून त्यानंतरच त्यावर आधारित तांत्रिक विषय शिकविल्यास विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)