शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

गायकवाड बंधूंची मायमराठीची विश्वपरिक्रमा

By admin | Updated: September 11, 2016 01:35 IST

नाशिकच्या सुपुत्रांचा पराक्रम : विदेशी भूमीत मराठी साहित्य संमेलनांचा मांडव

धनंजय वाखारे नाशिकअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामार्फत मोठ्या ‘कौतुका’ने सुरू केलेला विश्व साहित्य संमेलनाचा प्रपंच गेल्या सहा वर्षांपासून थांबला असताना कोणत्याही सरकारी अनुदानाविना साहित्य रसिकांच्याच पुंजीतून मायमराठीची विश्वपरिक्रमा नाशिकचे गायकवाड बंधू गेल्या पाच वर्षांपासून अखंडपणे करत आले आहेत. साहित्य संमेलनाला एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त न करता नव्या वाटा चोखाळत यंदा सहाव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा मांडव येत्या २२ व २३ सप्टेंबरला भूतानची राजधानी थिम्पू याठिकाणी पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या भूमीत वाढलेल्या प्रमोद आणि नीलेश गायकवाड या बंधूंनी मराठी भाषेचा झेंडा अटकेपार नेण्याचा पराक्रम गाजवला आहे. एका सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलांनी घडविलेली मायमराठीची विश्वसेवा अचंबित करणारी आणि अनुकरणीय अशीच आहे. ‘मराठी भाषेचे आभाळ जेवढे मोठे तेवढीच खोलीदेखील अधिक’ या विचाराने प्रभावित झालेल्या गायकवाड बंधूंनी आपल्या व्यवसायाची सूत्रे सांभाळतानाच मातृभाषा ‘मराठी’ला जगभरात नेऊन पोहोचविण्याचा संकल्प सोडला आणि म्हणता म्हणता गेल्या पाच वर्षांत अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि मॉरिशस याठिकाणी मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करत सरकारी अनुदानावर आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून फुकटात परदेशवारी करणाऱ्या साहित्य महामंडळाला सणसणीत चपराक लगावलेली आहे. निनाद बेडेकर, विनय सहस्त्रबुद्धे, विजय कुवळेकर, डी. एस. कुलकर्णी आदिंनी या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. सुरुवातीला शिवसंघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून परदेशात मराठी भाषेचा यज्ञ धगधगत ठेवणाऱ्या गायकवाड बंधूंनी आता विश्व मराठी परिषदेची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या बदलाचे वारे ओळखून आपली शिडे उभारण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या गायकवाड बंधूंनी संमेलन हे फक्त मराठी साहित्य या पुरताच मर्यादित न राहता ते क्रीडा, आरोग्य, व्यावसायिक आदि क्षेत्रांनाही स्पर्श करणारे असेल, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच भूतानमध्ये भरणाऱ्या संमेलनात ‘माध्यम’ हा विषय निवडण्यात आला असून, नव्या माध्यमांसह प्रस्थापित माध्यमांच्या संदर्भात चिंतन होणार आहे. परदेशात साहित्य संमेलने भरविणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे, याची अनुभूती अखिल भारतीय साहित्य महामंडळालाही आली आहे. कौतिकराव ठाले पाटलांनी मांडलेला हा प्रपंच आता थांबलेला आहे. परंतु गायकवाड बंधूंकडे फार मोठे मनुष्यबळ नसतानाही मायमराठीचा विश्वयज्ञ गेल्या पाच वर्षांपासून विदेशी भूमीवर धगधगतो आहे. अर्थातच या विश्वसाहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा आधार लाभला आहे. प्रत्येक संमेलनाला पदरमोड करून हजेरी लावणारे भारतीय रसिक पुढच्या संमेलनासाठी आपली नोंदणी आगाऊ करून ठेवतात, हेच या संमेलनाच्या यशस्वीतेचे खरे गमक आहे.