शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:18 IST

नाशिक: जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमविणाऱ्या ११ हजार ५४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील ...

नाशिक: जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमविणाऱ्या ११ हजार ५४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील १९५२ मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत सरासरी ७० टक्के इतके मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला मात्र तत्काळ यंत्रे बदलून देण्यात आली. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवार दि. १८ रोजी तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५५ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्याने उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील १० लाख ९६ हजार १६२ मतदारांपैकी सुमारे ७ लाख ५३ हजार २८१ मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६८.८७ टक्के इतके मतदान झाले. सायंकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. महिला मतदार आणि वयोवृद्धांचा मतदानासाठीचा उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत सर्वत्र शांततेत मतदान सुरू असतांना जिल्ह्यातील अनेक भागात मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बदलून देण्याची वेळ आली.

--इन्फो--

त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरीत ८० टक्के पेक्षा अधिक मतदान

त्र्यंबकेश्वर येथील तीन, दिंडोरीतील ५३ तर इगतपुरीतील ७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात मतदारांचा उत्साह अधिक दिसून आला. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. मात्र इगतपुरी, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत ८० टक्केच्या पुढे मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० पर्यंत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेनुसार येथील आकडेवारी इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक असू शकते.

--इन्फो--

३३ केंद्रांवर ईव्हीएम बदलले

जिल्ह्यातील एकूण १९५२ मतदान केंद्रांपैकी ३३ मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाला. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. येथील मतदान यंत्रे बदलण्याची वेळ आली. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. निवडणुकीसाठी २५६० कंट्रोल युनिट तसेत २५६० ईव्हीएम यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ५०० अतिरिक्त यंत्रे ठेवण्यात आली होती.

--कोट--

निवडणूक शांततेत

संपूर्ण जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडली. दिवसभरात काही ठिकाणी ईव्हीएम बाबत तांत्रिक अडचण आल्याने वेळेत मशीन्स बदलून देण्यात आली. त्यामुळे कुठेही मतदानात खंड पडला नाही. प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.