शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त योजनेचा आटला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली आहेत. या कामासाठी विविध १७ लेखाशिर्षमधून निधी मिळत असला तरी तो अत्यल्प असल्याने कामांना गती मिळणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देकामे पुढे सरकेना : कामे पूर्ण करण्याची कसोटी

नाशिक : डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली आहेत. या कामासाठी विविध १७ लेखाशिर्षमधून निधी मिळत असला तरी तो अत्यल्प असल्याने कामांना गती मिळणेही कठीण झाले आहे.राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीसह, लघुपाटबंधारे, कृषी अशा अन्य विभागांच्या लेखाशिर्षमधून निधी दिला जातो. परंतु सदर निधी अत्यल्प असल्यामुळे उत्तर महाराष्टÑातील कामे गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत पुढे सरकणे कठीण होऊन बसले आहे. जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागत असल्याने उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.उत्तर महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियान २०१८-१९ अंतर्गत ११२३ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमधून एकूण १९,८३८ गावांमध्ये जलयुक्तची कामे मागीलवर्षी हाती घेण्यात आली होती. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय निधीची तरतूद तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती. परंतु आता या कामांची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या कामांसाठी निधीची तरतूद केलेली नाही. या कामांसाठी अन्य स्त्रोताच्या माध्यमातून मिळणाºया निधीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यांमधील कामांचे भवितव्य अंधारात आले आहे.फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नाशिक जिल्ह्यात ७० कामे, धुळे जिल्ह्यात १९७, नंदुरबार जिल्ह्यातील ४५६, जळगावमधील ७१८, तर नगर जिल्ह्यातील ३८ याप्रमाणे १४७९ कामांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कामाची संथ गतीचार महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्याचे काम ९८ टक्के झाले होते ते फेब्रुवारी १४ पर्यंत ९९ टक्के, धुळे जिल्ह्याचे काम ८६ वरून ८८, नगर जिल्ह्यातील काम ९९ टक्के असलेले काम कायम आहे. जळगाव ८२ टक्केवरून ८३ टक्के, तर नंदुरबार ७६ वरून ७९ टक्केइतकेच पुढे सरकले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारJalyukt Shivarजलयुक्त शिवार