शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळाला, कामे बदलण्याची धावपळ आमदारांची धावाधाव : दोन कोटी खर्चात अग्रेसर

By admin | Updated: September 5, 2014 00:34 IST

निधी मिळाला, कामे बदलण्याची धावपळ आमदारांची धावाधाव : दोन कोटी खर्चात अग्रेसर

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्यांपूर्वी आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी देण्यात आलेले दोन कोटी रुपये खर्ची पाडण्यास जिल्ह्यातील सर्वच आमदार अग्रेसर असल्याचे आढळून आले असून, या निधीतून विकासकामे सुचविल्यानंतर आता मतदारसंघाचा दौरा करताना पाच वर्षे अविकसित राहिलेल्या भागाची जाणीव होऊन कामे बदलण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. विशेष करून एकाच कामावर एक कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्या रकमेत मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये तीन ते चार कामे करण्याचा सपाटा आमदारांनी लावला आहे. त्यासाठी यापूर्वी सुचविलेली कामे रद्द करून, नवीन कामांसाठी निधीची उपलब्धता, प्रशासकीय मान्यता मिळवून झटपट त्याचे भूमिपूजन करून फलकही लावण्यास सुरुवात झाली आहे. (पान २ वर)यात जवळपास सर्वच आमदारांचा पुढाकार असून, निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच कामांना मंजुरी व ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यासाठी धावाधाव केली जात आहे. मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध करून दिले जातात. सलग चार वर्षे मिळालेल्या निधीतून आमदारांनी आपापल्या मतदारसंघात तातडीच्या व निकडीच्या कामांवर खर्च केला. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातच विधानसभेची निवडणूक होत असल्यामुळे विद्यमान आमदारांना चालू आर्थिक वर्षासाठी निधी मिळेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात असताना, निवडणुकीचे वर्ष म्हणून राज्य सरकारने विद्यमान आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी एप्रिल महिन्यानंतर उपलब्ध करून दिला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने आमदारांना आपापल्या मतदारसंघात दोन कोटी रुपये विकासकामांवर खर्च करण्यासाठी धावपळ करावी लागली. आॅगस्ट अखेरच जवळपास सर्वच आमदारांनी दोन कोटी रुपये खर्चाचे नियोजन केले, परंतु जून, जुलैमध्ये मतदारसंघाचा दौरा करताना अनेक गावांमध्ये पाच वर्षांत कोणतीही कामे न झाल्यामुळे मतदारांकडून नाराजी व्यक्त होत असल्याचे पाहून भानावर आलेल्या आमदारांनी अगोदर रस्ते व मोठ्या बांधकामांवर सुचविलेला निधी पुन्हा परत घेऊन छोटी छोटी खेडी व गावांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी वळविला आहे. विशेष करून समाजमंदिर व सभामंडपावर भर दिला जात असून, कारण त्यावर आमदाराचे कायमस्वरूपी नाव लावले जाणार आहे.