शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:12 IST

पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. साधारणपणे ३५ ते ४० टक्के बाजारभाव घसरलेले आहेत.  बाजार समितीत कारली, भोपळा, वांगी, भेंडी, दोडका, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांची आवक होत आहे. पावसामुळे फळभाज्यांना पोषक वातावरण मिळत असल्याने उत्पादन वाढले आहे. शनिवारी बाजार समिती बंद असल्याने सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेत फळभाज्या शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या विक्रीसाठी घेऊन आले होते. नाशिकसह मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने अन्य बाजारपेठेत पावसामुळे शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरलेले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. सोमवारी बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कारली १२ किलो जाळीला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला. कारली ५०० रुपये जाळी दराने विक्री झाली होती. कारली पाठोपाठ भोपळा १८ नग १७० रुपये, शिमला मिरची ३०० रुपये जाळी म्हणजे २५ रुपये प्रती किलो दराने विक्र ी झाली, तर वांगी २५० रुपये (२० रुपये किलो) असा बाजारभाव मिळाला. पाऊस सुरू झाल्याने अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने तसेच फळभाज्यांची काही प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभावात काहीसी घसरण झाली आहे. टमाटा मालाची आवक कमीच असल्याने बाजारभाव टिकून आहेत.  दरम्यान, सिडको, इंदिरानगर, सातपूर भागातील छोट्या भाजीबाजारांमध्ये मात्र भाज्यांचे भाव जास्त असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.