शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:12 IST

पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. साधारणपणे ३५ ते ४० टक्के बाजारभाव घसरलेले आहेत.  बाजार समितीत कारली, भोपळा, वांगी, भेंडी, दोडका, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांची आवक होत आहे. पावसामुळे फळभाज्यांना पोषक वातावरण मिळत असल्याने उत्पादन वाढले आहे. शनिवारी बाजार समिती बंद असल्याने सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेत फळभाज्या शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या विक्रीसाठी घेऊन आले होते. नाशिकसह मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने अन्य बाजारपेठेत पावसामुळे शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरलेले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. सोमवारी बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कारली १२ किलो जाळीला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला. कारली ५०० रुपये जाळी दराने विक्री झाली होती. कारली पाठोपाठ भोपळा १८ नग १७० रुपये, शिमला मिरची ३०० रुपये जाळी म्हणजे २५ रुपये प्रती किलो दराने विक्र ी झाली, तर वांगी २५० रुपये (२० रुपये किलो) असा बाजारभाव मिळाला. पाऊस सुरू झाल्याने अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने तसेच फळभाज्यांची काही प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभावात काहीसी घसरण झाली आहे. टमाटा मालाची आवक कमीच असल्याने बाजारभाव टिकून आहेत.  दरम्यान, सिडको, इंदिरानगर, सातपूर भागातील छोट्या भाजीबाजारांमध्ये मात्र भाज्यांचे भाव जास्त असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.