शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
2
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
3
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
4
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
5
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
6
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
8
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
9
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
10
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
11
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
12
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
13
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
14
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
15
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
16
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
17
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
18
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
19
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
20
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

खासगी ट्रॅव्हल्सला मोकळे रान, आंतर जिल्हा बंद, पर आंतरराज्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:15 IST

नाशिक- कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी आंतरजिल्हा खासगी बस वाहतूक बंद असली तरी त्यानंतरही काही खासगी बस गाड्यांचा ...

नाशिक- कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी आंतरजिल्हा खासगी बस वाहतूक बंद असली तरी त्यानंतरही काही खासगी बस गाड्यांचा ट्रॅव्हलमधून आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक जोरात आहे. परराज्यातील रजिस्ट्रेशन असलेल्या असलेल्या बस थेट भाड्याने घेऊन गोरखपूर, कानपूर, उदयपूर अशा सर्वच ठिकाणी चाेरी छुपे जोरात प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यावर कुणाचा अंकुश नाही.

गेल्या महिन्यात कोरोनाचे वाढत प्रमाण लक्षात घेऊन अनेक निर्बंध राज्य शासनाने घातले. त्यानंतर २२ एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले. आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक बंद असून ई पास शिवाय कोणालाही अन्य जिल्ह्यात जाता येत नाही अशी स्थिती असली तरी नियम धाब्यावर बसवून अनेक भागात प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यासााठी काही दलालही आहेत. नेपाळ किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान पासून बनारसपर्यंत नेण्यासाठी नाशिकसह राज्यात अनेक दलाल आहेत. गरजेनुसार प्रवाशांना गाठून पैसे घेतात आणि परराज्यातील पासिंगच्या गाड्यांचा वापर करून त्यांना थेट पोहोचवतात. अनेकांना तर राज्य परराज्यातील पोलिसांना वश करण्याची कला अवगत आहे तर काही ठिकाणी वळण मार्गाने नेले जात आहे. नाशिकमधून काही ट्रॅव्हल्सच्या बस भरून जातात. उड्डाण पूल किंवा अन्य आडनीड मार्गावरून प्रवाशांना नेताना आरोग्य नियमांचे पालन केला जात नाही. ३५ आसनी बसमध्ये सध्या पन्नासहून अधिक प्रवासी नेले जातात. सॅनिटायझर, सुरक्षित अंतर मास्क असे कसलेही पालन होत नसल्याचे सांगितले जाते.

इन्फो...

अशी आहे आकडेवारी

४५

शहरातून जाणऱ्या ट्रॅव्हल्स

२०

रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स

४००

प्रवाशांची संख्या

इन्फो..

ना मास्क ना सॅनिटायझर

सध्या ज्या ट्रॅव्हलच्या गाड्या जात आहेत. त्यात आरोग्य नियमांचे कोणतेही पालन होत नसल्याचे सांगण्यात येते आहे. मुळातच आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी शासनाचे नियम हे अधिकृत प्रवासी वाहतुकीसाठी आहेत. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीसाठी नियम कोण तपासणार आणि काय कारवाई करणार असा प्रश्न आहे.

इन्फो...

कारवाईचा बार फुसका

शहराच्या काही भागातून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सर्रास भरून जात आहेत. मात्र त्यांचा शोध घेऊन कोणतीही कारवाई हेात नाही. या उलट जे अधिकृत खासगी प्रवासी वाहतूक करणारे आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाते. अनाधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्यांबाबत सौम्य धेारण असते अशी तक्रार आहे. तसेच अनेक चालक हे आडमार्गाने गाड्या बरोबर त्याच गावाकडे नेतात.

इन्फेा..

ई पास कोणाकडेच नाही

शासनाकडून अधिकृत प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे फावले आहे. अशा अनाधिकृत प्रवासी वाहतूकीसाठी कोणाकडेही ई पास नसतेा. मात्र, त्यानंतरही गोरखपूर, लखनौ, कानपूर, बनारस, उदय पूर अशा ठिकाणी गाड्या जातात. मुंबई, माझीवाडा, कल्याण, पुणे येथून गाड्या भरून येतात आणि त्याच नाशिकमधून प्रवासी घेऊन जातात.