शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

खासगी ट्रॅव्हल्सला मोकळे रान, आंतर जिल्हा बंद, पर आंतरराज्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:15 IST

नाशिक- कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी आंतरजिल्हा खासगी बस वाहतूक बंद असली तरी त्यानंतरही काही खासगी बस गाड्यांचा ...

नाशिक- कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी आंतरजिल्हा खासगी बस वाहतूक बंद असली तरी त्यानंतरही काही खासगी बस गाड्यांचा ट्रॅव्हलमधून आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक जोरात आहे. परराज्यातील रजिस्ट्रेशन असलेल्या असलेल्या बस थेट भाड्याने घेऊन गोरखपूर, कानपूर, उदयपूर अशा सर्वच ठिकाणी चाेरी छुपे जोरात प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यावर कुणाचा अंकुश नाही.

गेल्या महिन्यात कोरोनाचे वाढत प्रमाण लक्षात घेऊन अनेक निर्बंध राज्य शासनाने घातले. त्यानंतर २२ एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले. आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक बंद असून ई पास शिवाय कोणालाही अन्य जिल्ह्यात जाता येत नाही अशी स्थिती असली तरी नियम धाब्यावर बसवून अनेक भागात प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यासााठी काही दलालही आहेत. नेपाळ किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान पासून बनारसपर्यंत नेण्यासाठी नाशिकसह राज्यात अनेक दलाल आहेत. गरजेनुसार प्रवाशांना गाठून पैसे घेतात आणि परराज्यातील पासिंगच्या गाड्यांचा वापर करून त्यांना थेट पोहोचवतात. अनेकांना तर राज्य परराज्यातील पोलिसांना वश करण्याची कला अवगत आहे तर काही ठिकाणी वळण मार्गाने नेले जात आहे. नाशिकमधून काही ट्रॅव्हल्सच्या बस भरून जातात. उड्डाण पूल किंवा अन्य आडनीड मार्गावरून प्रवाशांना नेताना आरोग्य नियमांचे पालन केला जात नाही. ३५ आसनी बसमध्ये सध्या पन्नासहून अधिक प्रवासी नेले जातात. सॅनिटायझर, सुरक्षित अंतर मास्क असे कसलेही पालन होत नसल्याचे सांगितले जाते.

इन्फो...

अशी आहे आकडेवारी

४५

शहरातून जाणऱ्या ट्रॅव्हल्स

२०

रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स

४००

प्रवाशांची संख्या

इन्फो..

ना मास्क ना सॅनिटायझर

सध्या ज्या ट्रॅव्हलच्या गाड्या जात आहेत. त्यात आरोग्य नियमांचे कोणतेही पालन होत नसल्याचे सांगण्यात येते आहे. मुळातच आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी शासनाचे नियम हे अधिकृत प्रवासी वाहतुकीसाठी आहेत. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीसाठी नियम कोण तपासणार आणि काय कारवाई करणार असा प्रश्न आहे.

इन्फो...

कारवाईचा बार फुसका

शहराच्या काही भागातून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सर्रास भरून जात आहेत. मात्र त्यांचा शोध घेऊन कोणतीही कारवाई हेात नाही. या उलट जे अधिकृत खासगी प्रवासी वाहतूक करणारे आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाते. अनाधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्यांबाबत सौम्य धेारण असते अशी तक्रार आहे. तसेच अनेक चालक हे आडमार्गाने गाड्या बरोबर त्याच गावाकडे नेतात.

इन्फेा..

ई पास कोणाकडेच नाही

शासनाकडून अधिकृत प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे फावले आहे. अशा अनाधिकृत प्रवासी वाहतूकीसाठी कोणाकडेही ई पास नसतेा. मात्र, त्यानंतरही गोरखपूर, लखनौ, कानपूर, बनारस, उदय पूर अशा ठिकाणी गाड्या जातात. मुंबई, माझीवाडा, कल्याण, पुणे येथून गाड्या भरून येतात आणि त्याच नाशिकमधून प्रवासी घेऊन जातात.