शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘मुक्त’च्या विद्यार्थ्यांना एसटीचा बाय‘पास’

By admin | Updated: May 26, 2014 13:09 IST

एसटी महामंडळाने बाय‘पास’ केल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. अभ्यास केंद्र संचालकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्याने आता विद्यापीठ महामंडळाची मनधरणी केली जाणार असल्याचे समजते.

 

सतीश डोंगरे   नाशिक ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रिद घेऊन दुर्गम भागापर्यंत पोहोचलेल्या अन् आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थिसंख्या असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाने बाय‘पास’ केल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. याबाबत काही अभ्यास केंद्र संचालकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्याने आता विद्यापीठ प्रशासनाकडून एसटी महामंडळाची मनधरणी केली जाणार असल्याचे समजते. समाजातील सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाने भारंभार अभ्यासक्रम सुरू केले. शहरी भागातच नव्हे, तर दुर्गम भागातही विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणे अपेक्षित आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळाने या विद्यार्थ्यांना एसटीचा सवलतीचा पास नाकारल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एसटी विद्यार्थ्यांसाठी खास मासिक पाससाठी सवलत देते. त्यात तांत्रिक, व्यावसायिक आणि अन्य शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. पाचवीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी पासचे लाभार्थी आहेत. एसटीने कोट्यवधी रुपयांची सवलत दिली असून, सन २०१२-१३ मध्ये ९ कोटी ७९ लाख ५१ हजार २०० रुपयांची, तर सन २०१३-१४ मध्ये सप्टेंबरअखेर १२ कोटी २७ लाख ५० हजार ७४० रुपयांची सवलत दिली आहे. लाभार्थींत तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार ७०९ इतकी आहे. परंतु यामध्ये मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नसल्याने त्यांनाही एसटीची सवलत मिळावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. दरम्यान, याबाबत एसटी प्रशासनाला विचारले असता त्यांनी अनुदान असलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व २४ वर्षांआतील विद्यार्थ्यांनाच महामंडळाच्या एसटी पास या योजनेचा लाभ घेता येऊ शकत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हे नोकरी किंवा व्यवसाय करून शिक्षण घेणारे असल्याने त्यांन्+ाा महामंडळाकडून सवलत देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे कारण देत पास नाकारल्याचे समजते. तर राज्य परिवहन महामंडळाच्या या भूमिकेबाबत अभ्यास केंद्र संचालकांकडून विरोध दर्शविला जात असून, महामंडळाने सर्वच विद्यार्थ्यांना पासेस देण्याची गरज असल्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाने पासेस द्यावे याकरिता पाठपुरावा केला जाणार आहे. मुक्त विद्यापीठात नोकरी अथवा व्यवसाय करून शिक्षण घेणे शक्य असल्याचे कारण सांगत महामंडळ विद्यार्थ्यांना पास नाकारत आहे; परंतु आदिवासी दुर्गम भागातदेखील विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने त्यांना महामंडळाने सवलतीचा पास देणे अपेक्षित आहे. - डॉ. प्रकाश अतकरे, कुलसचिव, मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाकडून प्रायोगिक तत्त्वावर अनेक अभ्यासक्रम चालविले जातात; मात्र शासननियमाप्रमाणे या विद्यार्थ्यांना सवलतीचा पास देणे शक्य नाही. कारण जेव्हा महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पास दिला जातो, तेव्हा दहा टक्केच रक्कम विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. उर्वरित रक्कम शासन कोट्यातून जमा होते. त्यामुळे लेखापरीक्षण करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. - व्ही. एस. गणोरे, वाहतूक निरीक्षक