शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

‘मुक्त’च्या विद्यार्थ्यांना एसटीचा बाय‘पास’

By admin | Updated: May 26, 2014 13:09 IST

एसटी महामंडळाने बाय‘पास’ केल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. अभ्यास केंद्र संचालकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्याने आता विद्यापीठ महामंडळाची मनधरणी केली जाणार असल्याचे समजते.

 

सतीश डोंगरे   नाशिक ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रिद घेऊन दुर्गम भागापर्यंत पोहोचलेल्या अन् आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थिसंख्या असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाने बाय‘पास’ केल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. याबाबत काही अभ्यास केंद्र संचालकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्याने आता विद्यापीठ प्रशासनाकडून एसटी महामंडळाची मनधरणी केली जाणार असल्याचे समजते. समाजातील सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाने भारंभार अभ्यासक्रम सुरू केले. शहरी भागातच नव्हे, तर दुर्गम भागातही विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणे अपेक्षित आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळाने या विद्यार्थ्यांना एसटीचा सवलतीचा पास नाकारल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एसटी विद्यार्थ्यांसाठी खास मासिक पाससाठी सवलत देते. त्यात तांत्रिक, व्यावसायिक आणि अन्य शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. पाचवीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी पासचे लाभार्थी आहेत. एसटीने कोट्यवधी रुपयांची सवलत दिली असून, सन २०१२-१३ मध्ये ९ कोटी ७९ लाख ५१ हजार २०० रुपयांची, तर सन २०१३-१४ मध्ये सप्टेंबरअखेर १२ कोटी २७ लाख ५० हजार ७४० रुपयांची सवलत दिली आहे. लाभार्थींत तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार ७०९ इतकी आहे. परंतु यामध्ये मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नसल्याने त्यांनाही एसटीची सवलत मिळावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. दरम्यान, याबाबत एसटी प्रशासनाला विचारले असता त्यांनी अनुदान असलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व २४ वर्षांआतील विद्यार्थ्यांनाच महामंडळाच्या एसटी पास या योजनेचा लाभ घेता येऊ शकत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हे नोकरी किंवा व्यवसाय करून शिक्षण घेणारे असल्याने त्यांन्+ाा महामंडळाकडून सवलत देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे कारण देत पास नाकारल्याचे समजते. तर राज्य परिवहन महामंडळाच्या या भूमिकेबाबत अभ्यास केंद्र संचालकांकडून विरोध दर्शविला जात असून, महामंडळाने सर्वच विद्यार्थ्यांना पासेस देण्याची गरज असल्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाने पासेस द्यावे याकरिता पाठपुरावा केला जाणार आहे. मुक्त विद्यापीठात नोकरी अथवा व्यवसाय करून शिक्षण घेणे शक्य असल्याचे कारण सांगत महामंडळ विद्यार्थ्यांना पास नाकारत आहे; परंतु आदिवासी दुर्गम भागातदेखील विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने त्यांना महामंडळाने सवलतीचा पास देणे अपेक्षित आहे. - डॉ. प्रकाश अतकरे, कुलसचिव, मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाकडून प्रायोगिक तत्त्वावर अनेक अभ्यासक्रम चालविले जातात; मात्र शासननियमाप्रमाणे या विद्यार्थ्यांना सवलतीचा पास देणे शक्य नाही. कारण जेव्हा महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पास दिला जातो, तेव्हा दहा टक्केच रक्कम विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. उर्वरित रक्कम शासन कोट्यातून जमा होते. त्यामुळे लेखापरीक्षण करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. - व्ही. एस. गणोरे, वाहतूक निरीक्षक