शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार लाख रोपांची लागवड

By admin | Updated: July 2, 2017 00:15 IST

वनविभाग : संततधारेत वनमहोत्सवाला दमदार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वन मंत्रालयाक डून राज्यस्तरावर चार कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट चालू आठवड्यात वनमहोत्सवाद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्णात वनविभागाच्या वतीने सुमारे चार लाख ६९ हजार ८७६ रोपांची यशस्वीरीत्या लागवड शनिवारी (दि.१) करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.राज्यस्तरावर वनमहोत्सव लोकसहभागातून राबविला जात आहे. वनविभागासह सर्वच शासकीय, निमशासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. शनिवारी या वनमहोत्सवाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. इगतपुरीजवळील बोरटेंभे या ठिकाणी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह वनविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. वनविभागाच्या पश्चिम भागाला सहा लाख अठरा हजार ९७५ रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २९ ठिकाणी पश्चिम विभागाकडून एक लाख २३ हजार ५४० रोपांची लागवड करण्यात आली. वनविभाग पूर्वच्या वतीने सहा लाख बारा हजार १५१ रोपांच्या उद्दिष्टांपैकी पहिल्या दिवशी ९४ हजार १०८ रोपे २९ ठिकाणांवर लावण्यात आली. मालेगाव वनविभागाच्या हद्दीत ४३ ठिकाणांवर नऊ लाख ५३ हजार रोपांच्या उद्दिष्टांपैकी शनिवारी एक लाख ४० हजार ७५१ रोपे लावली गेली. सामाजिक वनीकरण विभागाकडून एक लाख एक हजार रोपांच्या उद्दिष्टांपैकी २२ हजार ९५० रोपे लावली गेली, तर वनविकास महामंडळाने तीन लाख ५० हजार रोपे लागवडीच्या उद्दिष्टांपैकी ८८ हजार ३२७ रोपे ३८ ठिकाणांवर लावली. वन्यजीव विभागाने एका ठिकाणी २०० रोपांची लागवड केली. वनमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरासह जिल्ह्यात वनविभागाकडून सुमारे चार लाख ६९ हजार ८७६ रोपांची लागवड करण्यात आल्याचा दावा वन खात्याने केला आहे.भर पावसात एकत्र आले हजारो हातहरित भविष्यासाठी एक वृक्ष लावू व त्याचे संगोपन करू हे व्रत घेऊन वनमहोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी एकत्र येत हजारो रोपांची लागवड केली. भर पावसात वृक्षारोपणासाठी शेकडो हात एकत्र आले होते. रेनकोट, छत्र्यांचा आधार घेत लागवड करण्यात आली. लावलेल्या लाखो रोपांचे संवर्धन झाल्यास जंगलाचे क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे.