शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

चार दिवसांत पाच बळी

By admin | Updated: May 14, 2014 01:00 IST

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गासह घोटी शहराला जोडणार्‍या घोटी - सिन्नर व घोटी - वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे.

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गासह घोटी शहराला जोडणार्‍या घोटी - सिन्नर व घोटी - वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून दुचाकी व इतर वाहनाच्या अपघाताची मालिका कायम असून, गेली चार दिवसांपासून घोटी परिसरात झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले, तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई - आग्रा महामार्गावर गोंदे शिवारात लेहेर कारखान्याजवळ झालेल्या अपघातात आडवण येथील एका लष्करी जवानाचा मृत्यू झाला. यानंतर दुसर्‍या दिवशी घोटी वैतरणा रस्त्यावर वाकी शिवारात साहेबसिंग परदेशी या इसमाचा दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. यानंतर दुसर्‍या दिवशी घोटी - सिन्नर रस्त्यावर धामणीजवळ एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात चालकासह दहा जण गंभीर जखमी झाले. तर दुसर्‍या दिवशी घोटीजवळ किनारा हॉटेलसमोर दुचाकीला बसने धडक दिल्याने तळेगाव येथील नानासाहेब रायकर हे जागीच ठार झाले, तर इतर दोघे जण जखमी झाले. या अपघाताला काही तास उलटताच तोच काल रात्रीच्या सुमारास त्याच ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याने घोटीतील महेश ऊर्फ भावड्या जुंदरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. दरम्यान, महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असताना रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणार्‍या कंपनीकडून अपघात रोखण्यास उपाययोजना करण्यात सपशेल अपयश येत आहे. महामार्गाबरोबर कसारा घाटातही अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील तुटलेल्या संरक्षक भिंती, नष्ट झालेले गतिरोधक, वळण रस्त्यावरील वाढलेली झाडे, प्रचंड उतार, गायब झालेले दिशादर्शक फलक कारणीभूत ठरत असताना या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे.