शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शैक्षणिक संस्थांकडून आर्थिक पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

ग्राहक पंचायतीच्या शिक्षण समितीने शिक्षण संस्थांकडून पालकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक, शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जाणे, अवाजवी शिक्षण ...

ग्राहक पंचायतीच्या शिक्षण समितीने शिक्षण संस्थांकडून पालकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक, शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जाणे, अवाजवी शिक्षण फी वसुली, शिक्षण संस्थांतील ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधांची वानवा, पालक शिक्षक संघाची शासन नियमानुसार स्थापना करण्यास होत असलेली टाळाटाळ, सनदी लेखापालांकडून शाळांचे लेखापरीक्षण न होणे, मर्जीतील पालकांना हाताशी धरून कागदोपत्री पालक शिक्षक संघ स्थापन केल्याचे दाखवून अवाजवी शैक्षणिक शुल्क वाढविणे, कोरोना काळात संगणक, वाचनालय, प्रयोगशाळा, वाहतूक सेवा, जिमखाना, परीक्षा या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नसताना देखील या सुविधांच्या नावाखाली फी वसूल करणे अशा प्रकारचा मनमानी कारभार शिक्षण संस्थांकडून सुरू असल्याची तक्रार प्राप्त झालेली होती. शिक्षण संस्थांच्या या मनमानी कारभारामुळे पालक आणि विद्यार्थी प्रचंड त्रस्त झालेले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर झाला आहे. या सर्व प्रकारातून शिक्षण संस्था शासनाच्या शैक्षणिक धोरणाची आणि कायद्यांची अंमलबजावणी करीत नसल्याची बाब ग्राहक पंचायतीचे ॲड. श्रीधर व्यवहारे, सुधीर काटकर, उल्हास शिरसाट, प्रदीप यादव, प्रकाश जोशी, सुरेशचंद्र धारणकर, ॲड. समीर शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिली.

अवाजवी शैक्षणिक शुल्क वसूल करणाऱ्या, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षण संस्थांना आवर घालण्यासाठी शिक्षण विभागाने इयत्तानिहाय शिक्षण शुल्क जाहीर करण्याची मागणी यावेळी ग्राहक पंचायतीने केली. कायद्यांची पायमल्ली करून जनतेची, शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कायदेशीर कारवाईची मागणीही केली. बेकायदेशीर वसूल केलेली फी पालकांना परत करावी किंवा पुढील शैक्षणिक वर्षाच्या फीमध्ये वजावट करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, उपसंचालक नितीन उपासनी यांनी शासकीय अधिकारी, शैक्षणिक संस्था सदस्य, ग्राहक पंचायत सदस्य यांची समन्वय समिती स्थापन करण्याचे आश्वासन यावेळी दिले.