शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

पिंपरी हवेली येथील माती बंधाऱ्याचा भराव गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

न्यायडोंगरी : गेल्या चार दिवसांपासून दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र न्यायडोंगरीसह परिसरातील हिंगणे, पिंपरी हवेली, परधाडी, रणखेडा, ...

न्यायडोंगरी : गेल्या चार दिवसांपासून दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र न्यायडोंगरीसह परिसरातील हिंगणे, पिंपरी हवेली, परधाडी, रणखेडा, बिरोळा, पिंपरखेड या गावांना गाठलेच. सायं.६ वा.च्या सुमारास न्यायडोंगरी परिसरात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही क्षण का होईना धडकी भरविली. चार दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र रात्री पावसाचा जोर वाढून पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तोंडी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी राजा चिंतेत झाला आहे. शासनाने वेळीच पंचनामे करून तात्काळ मदत करावी, अशी मागणी सर्वच स्तरावरून केली जात आहे, तर विविध ठिकाणी विविध नुकसानीच्या घटना समोर येत आहेत.

पिंपरी हवेली, नायडोंगरी, रणखेडा या गावांमध्ये रात्रीच्या पावसाने लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रणखेडा, पिंपरी हवेली गावाला येणारा मार्गही बंद झाला असून, दळणवळण ठप्प झाले असून, गाव संपर्कहीन होण्याचा धोका आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने मदतकार्य राबविण्याची गरज आहे.

------------

न्यायडोंगरी गावावर टांगती तलवार

डोंगर परिसरात अतिवृष्टी झाल्याने प्रमुख तिन्ही नदीवर वनविभागात बांधण्यात आलेले १५ ते २० माती बंधाऱ्यांपैकी सात ते आठ मोठे बंधारे फुटण्याच्या स्थितीत आहेत. जर यापुढेही पावसाची अशीच स्थिती राहिली तर पिंपरी हवेली व न्यायडोंगरी गावाची खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते. कारण उगमापासून सर्व बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत व तिन्ही नदीवरील अनुक्रमे मातीचे मोठे बंधारे बेहडा, परधुने, जांभूळपाट, खारपाणी, तांबोळा अतिवृष्टी झाल्याने जलद पाणी प्रवाहामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा भराव खचला गेलेला आहे.

---------------

रणखेडा गावाचा मुख्य रस्ता गेला वाहून

रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावात येणाऱ्या रस्त्याचे भूस्खलन झालेले आहे. त्यामुळे गावाचा मुख्य रस्ता वाहून गेल्याने दळणवळण पूर्णपणे बंद झाले आहे. पावसाचे वाहते पाणी ६ ते ७ फुटापर्यंत साचल्याने लोकांच्या घरात पाणी घुसल्याने रणखेडा गावाला गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. रणखेडा येथील नागरिकांकडून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------

खंडेराव मंदिर परिसराकडून गावामध्ये येणाऱ्या वाहत्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक, संभाजी चौक, भवानी चौक, चांदणी चौक, एकलव्यनगर, बाजारपेठ परिसर जलमय, इंदूबाई रघुनाथ आहेर यांच्या घरात पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान, गोपाळ महानोर व राम नारायण शर्मा यांच्यासह अनेक घरांची परझड, बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी घुसले.

(०९ न्यायडोंगरी,१,२)

090921\09nsk_23_09092021_13.jpg

०९ न्यायडोंगरी १