शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी हवेली येथील माती बंधाऱ्याचा भराव गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

न्यायडोंगरी : गेल्या चार दिवसांपासून दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र न्यायडोंगरीसह परिसरातील हिंगणे, पिंपरी हवेली, परधाडी, रणखेडा, ...

न्यायडोंगरी : गेल्या चार दिवसांपासून दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र न्यायडोंगरीसह परिसरातील हिंगणे, पिंपरी हवेली, परधाडी, रणखेडा, बिरोळा, पिंपरखेड या गावांना गाठलेच. सायं.६ वा.च्या सुमारास न्यायडोंगरी परिसरात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही क्षण का होईना धडकी भरविली. चार दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र रात्री पावसाचा जोर वाढून पावसाने झोडपून काढले. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तोंडी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी राजा चिंतेत झाला आहे. शासनाने वेळीच पंचनामे करून तात्काळ मदत करावी, अशी मागणी सर्वच स्तरावरून केली जात आहे, तर विविध ठिकाणी विविध नुकसानीच्या घटना समोर येत आहेत.

पिंपरी हवेली, नायडोंगरी, रणखेडा या गावांमध्ये रात्रीच्या पावसाने लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रणखेडा, पिंपरी हवेली गावाला येणारा मार्गही बंद झाला असून, दळणवळण ठप्प झाले असून, गाव संपर्कहीन होण्याचा धोका आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने मदतकार्य राबविण्याची गरज आहे.

------------

न्यायडोंगरी गावावर टांगती तलवार

डोंगर परिसरात अतिवृष्टी झाल्याने प्रमुख तिन्ही नदीवर वनविभागात बांधण्यात आलेले १५ ते २० माती बंधाऱ्यांपैकी सात ते आठ मोठे बंधारे फुटण्याच्या स्थितीत आहेत. जर यापुढेही पावसाची अशीच स्थिती राहिली तर पिंपरी हवेली व न्यायडोंगरी गावाची खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते. कारण उगमापासून सर्व बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत व तिन्ही नदीवरील अनुक्रमे मातीचे मोठे बंधारे बेहडा, परधुने, जांभूळपाट, खारपाणी, तांबोळा अतिवृष्टी झाल्याने जलद पाणी प्रवाहामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा भराव खचला गेलेला आहे.

---------------

रणखेडा गावाचा मुख्य रस्ता गेला वाहून

रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावात येणाऱ्या रस्त्याचे भूस्खलन झालेले आहे. त्यामुळे गावाचा मुख्य रस्ता वाहून गेल्याने दळणवळण पूर्णपणे बंद झाले आहे. पावसाचे वाहते पाणी ६ ते ७ फुटापर्यंत साचल्याने लोकांच्या घरात पाणी घुसल्याने रणखेडा गावाला गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. रणखेडा येथील नागरिकांकडून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------

खंडेराव मंदिर परिसराकडून गावामध्ये येणाऱ्या वाहत्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक, संभाजी चौक, भवानी चौक, चांदणी चौक, एकलव्यनगर, बाजारपेठ परिसर जलमय, इंदूबाई रघुनाथ आहेर यांच्या घरात पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान, गोपाळ महानोर व राम नारायण शर्मा यांच्यासह अनेक घरांची परझड, बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी घुसले.

(०९ न्यायडोंगरी,१,२)

090921\09nsk_23_09092021_13.jpg

०९ न्यायडोंगरी १