शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

परीक्षा फॉर्म भरला गणिताचा, गुण मिळाले जीवशास्त्राचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST

नाशिक : नाशिकरोडच्या केला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना शाळेच्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची घटना ताजी असतानाच ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयातील ...

नाशिक : नाशिकरोडच्या केला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना शाळेच्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची घटना ताजी असतानाच ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या चुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने २०२१ साठी परीक्षा अर्जात गणित विषय नमूद केला. मात्र, निकालानंतर गणिताऐवजी जीवशास्त्र विषयाचे गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता निकालपत्रातील चूक बदलण्यासाठी त्या विद्यार्थिनीसह तिच्या पालकांवर विभागीय शिक्षण मंडळ, तसेच महाविद्यालयात खेट्या घालण्याची वेळ आली आहे.

देशातील कोरोना संसर्ग दुसरी लाट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने दहावी, बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणांकनानुसार उत्तीर्ण केले होते. जुलै महिन्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पंचवटीतील तारवालानगरला राहणाऱ्या स्नेहल भूषण देशमुख या विद्यार्थिनीने ब्रह्मा व्हॅलीत बारावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला होता. परीक्षा अर्ज भरताना इंग्रजी, हिंदी, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित नमूद केले होते. यंदा परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे गुणांकनानुसार निकाल घोषित झाला. देशमुखला ८२ टक्के गुण मिळाले. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, निकालपत्र हाती मिळताच, तिचा भ्रमनिरास झाला. निकालपत्रात गणिताऐवजी जीवशास्त्राचे गुण मिळाल्याचे पाहून तिला धक्का बसला. निकालपत्रातील चुकीबाबत देशमुखने महाविद्यालयात धाव घेतली असता निकालपत्राची प्रत आल्यावर बदल होईल असे सांगितले. त्यानंतर आठवडाभराने निकालपत्र मिळताच महाविद्यालयात दुरुस्ती कामासाठी संपर्क केला. त्यावर सदर

महाविद्यालयाने चूक दुरुस्तीसाठी प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे पाठविला. तेथे संपर्क साधला असता, शिक्षण मंडळाने आमची काही चूक नसल्याचे सांगून हात वर केले. महाविद्यालयात गेल्यावर महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या शिक्षकाकडून चुकीच्या विषयाचे गुण दिले अशी कबुली देत शिक्षण मंडळाला माफीनामा लिहून देत चूक दुरुस्तीसाठी पत्र दिले. मात्र, सव्वामहिना होऊनही शिक्षण मंडळ लक्ष घालत नाही. परिणामी विद्यार्थिनीची मानसिक स्थिती ढासळली आहे. शिक्षण विभाग व महाविद्यालय प्रशासन दखल घेत नसल्याने काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीने राज्यमंत्री बच्चू कडू यांना निकालपत्रातील चूक दुरुस्त करावी, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

इन्फो====

सीईटी परीक्षा कशी देणार?

मला आगामी शिक्षण अभियांत्रिकीला घ्यायचे आहे. गणित विषयाचा अभ्यास करून गणिताचा अर्ज भरला, तर सीईटी परीक्षेसाठी गणिताचे नोटबुक महाविद्यालयात जमा केले आहे. असे असताना जीवशास्त्र विषयाचे गुण कसे काय मिळाले, यात माझी काही चूक नाही त्यामुळे माझे भविष्य व भावी आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने मी निराश झाले आहे.

-स्नेहल देशमुख, विद्यार्थिनी