शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:37 IST

कळवण : कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या असंतोषात भर पडली असून, कळवण येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकºयांनी कांद्याला हमीभाव मिळावा, अशा घोषणा देत बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर धाव घेऊन इमारतीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्दे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत : कार्यालयातील पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध

कळवण : कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या असंतोषात भर पडली असून, कळवण येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकºयांनी कांद्याला हमीभाव मिळावा, अशा घोषणा देत बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर धाव घेऊन इमारतीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.कळवण बाजार समितीत नाकोडा, अभोणा व कनाशी येथे कांद्याचे लिलाव होतात. कांद्याला केवळ दोनशे ते पाचशे रु पये भाव असल्याचे निदर्शनास आल्याने गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे आज बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून शेतकºयांनी असंतोषाला वाट करून देत रस्तावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. २ डिसेंबरच्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी कळवण तालुक्यातील नांदुरी येथे येणार असल्याने जिल्हा व तालुका पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा नियोजनात व्यस्त आहे.कांदा मातीमोल भावाने विक्र ी करावी लागत असल्याने कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून, सरकारवर रोष व्यक्त करून कांदा उत्पादक रास्ता रोको आंदोलन करीत असल्याने त्यांची दखल घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेळ नसल्याने कांदा उत्पादकांनी उघड नाराजी व्यक्त करून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर मिळेल त्या वाहनातून धाव घेतली.कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या मांडून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अर्धातास ठिय्या आंदोलन केले. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका करत सरकारने कांदाला हमीभाव द्यावा व कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी करून मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित नांदुरी येथील कार्यक्र म उधळून लावण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरे यांनी ठिय्या आंदोलनप्रसंगी बोलताना दिला. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कांदा उत्पादकानी परिसर दणाणून सोडला.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार यांनी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असून उत्पादन खर्चावर आधारित कांदाला भाव द्यावा, शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करून सरकारवर टीकास्त्र सोडले, शेतकरी हिताचे धोरण सरकारने स्वीकारावे नाही तर सरकार विरोधात जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी दिला.यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आंदोलनस्थळी येऊन कांदा उत्पादकांचे निवेदन स्वीकारावे अशी भूमिका घेऊन कांद्याला हमीभाव द्यावा अशी जोरदार घोषणाबाजी केली.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, कारभारी आहेर, पोपटराव पवार, मोहन जाधव, प्रवीण रांैदळ यांनी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले. यावेळी कृष्णा बच्छाव, सुभाष शिरोडे, के. के. शिंदे, दादा देशमुख, प्रभाकर निकम, टीनू पगार, प्रदीप पगार, संदीप वाघ, तेजस जाधव, रोशन जाधव, गोरख देवरे, आशुतोष आहेर आदींसह मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.