शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:37 IST

कळवण : कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या असंतोषात भर पडली असून, कळवण येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकºयांनी कांद्याला हमीभाव मिळावा, अशा घोषणा देत बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर धाव घेऊन इमारतीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्दे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत : कार्यालयातील पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध

कळवण : कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या असंतोषात भर पडली असून, कळवण येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकºयांनी कांद्याला हमीभाव मिळावा, अशा घोषणा देत बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर धाव घेऊन इमारतीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.कळवण बाजार समितीत नाकोडा, अभोणा व कनाशी येथे कांद्याचे लिलाव होतात. कांद्याला केवळ दोनशे ते पाचशे रु पये भाव असल्याचे निदर्शनास आल्याने गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे आज बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून शेतकºयांनी असंतोषाला वाट करून देत रस्तावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. २ डिसेंबरच्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी कळवण तालुक्यातील नांदुरी येथे येणार असल्याने जिल्हा व तालुका पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा नियोजनात व्यस्त आहे.कांदा मातीमोल भावाने विक्र ी करावी लागत असल्याने कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून, सरकारवर रोष व्यक्त करून कांदा उत्पादक रास्ता रोको आंदोलन करीत असल्याने त्यांची दखल घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेळ नसल्याने कांदा उत्पादकांनी उघड नाराजी व्यक्त करून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर मिळेल त्या वाहनातून धाव घेतली.कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या मांडून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अर्धातास ठिय्या आंदोलन केले. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका करत सरकारने कांदाला हमीभाव द्यावा व कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी करून मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित नांदुरी येथील कार्यक्र म उधळून लावण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरे यांनी ठिय्या आंदोलनप्रसंगी बोलताना दिला. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कांदा उत्पादकानी परिसर दणाणून सोडला.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार यांनी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असून उत्पादन खर्चावर आधारित कांदाला भाव द्यावा, शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करून सरकारवर टीकास्त्र सोडले, शेतकरी हिताचे धोरण सरकारने स्वीकारावे नाही तर सरकार विरोधात जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी दिला.यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आंदोलनस्थळी येऊन कांदा उत्पादकांचे निवेदन स्वीकारावे अशी भूमिका घेऊन कांद्याला हमीभाव द्यावा अशी जोरदार घोषणाबाजी केली.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, कारभारी आहेर, पोपटराव पवार, मोहन जाधव, प्रवीण रांैदळ यांनी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले. यावेळी कृष्णा बच्छाव, सुभाष शिरोडे, के. के. शिंदे, दादा देशमुख, प्रभाकर निकम, टीनू पगार, प्रदीप पगार, संदीप वाघ, तेजस जाधव, रोशन जाधव, गोरख देवरे, आशुतोष आहेर आदींसह मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.