शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

नाशिक : गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि ...

नाशिक : गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि नंतर अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. मात्र, आदिवासी भागासह अन्य कारणांमुळे कुपोषित बालकांमध्ये गोवरच्या अनेक दुष्परिणामांसह जिवाचा धोकादेखील संभवतो.

पूर्वी गोवर साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी साथीच्या स्वरूपात येत असे. आता गोवर लसीमुळे साथ कमी झाली आहे. आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षे वयातच येऊन जातो; पण तो उशिराही येऊ शकतो. गोवर एकदा येऊन गेला, की जवळजवळ आयुष्यभर गोवरविरुध्द टिकणारी प्रतिकारशक्ती देऊन जातो. म्हणून त्या व्यक्तीला परत गोवर होत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला गोवर झालेला नसेल तर आयुष्यात कधीही तो होऊ शकतो. गोवर उशिराच्या वयात येणे जास्त त्रासदायक असते. मात्र, आता सुदैवाने गोवरविरुध्द परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. काही पालक मुलाला पूर्वी एकदा गोवर होऊनही काही मुलांना पुन्हा ‘गोवर’ निघाला असे सांगतात. बहुधा हे आजार गोवरसदृश इतर विषाणूंमुळे असतात.

इन्फो

गोवर होण्याचे कारण

गोवर हा रोग विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर आपल्यासारख्या उष्ण वातावरणात फार काळ तग धरू शकत नाही; पण थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो. म्हणून हिवाळ्यात हा आजार जास्त बळावतो. गोवरचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणुप्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवरची लक्षणे दिसू लागतात. गोवरचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. सगळ्यात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकेच्या आतल्या भागात होतो. म्हणूनच गोवरमध्ये खोकला येतो. बऱ्याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. त्वचेवर उठणारे पुरळ हे सूक्ष्म केशवाहिन्यांना येणाऱ्या सुजेमुळे उठतात.

इन्फो

गोवरचे रोगनिदान

शरीरात एकदा विषाणूचा प्रवेश झाला की ८ ते १२ दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला आदी त्रास जाणवतो.

या काळात मोहरीएवढे लालसर ठिपके तोंडात गालाच्या अंतर्भागावर दिसतात. हे ठिपके म्हणजे गोवरची हमखास आढळणारी खूण आहे. पण एक-दोन दिवसांत हे ठिपके जातात. त्यामुळे रोगनिदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही. ठिपके दिसले तर मात्र गोवर आहे हे निश्चित होते.

इन्फो

...तर डॉक्टरांना दाखवा

पुरळ ज्या क्रमाने येते त्याच क्रमाने वरून खाली नाहीसे होतात. काही दिवस पुरळांच्या जागी खुणा राहतात. वाढत जाणारा ताप पुरळ उठायचे थांबल्यावर लगेच शमतो. तोंडातील पुरळांमुळे काही खाता येत नाही, भूक मंदावते. सर्वसाधारणपणे पुरळ निघायला सुरुवात झाल्यापासून सहा-सात दिवसांत मूल बरे होते. ताप उतरून नंतर पुन्हा येऊ लागल्यास किंवा पुरळ पायांपर्यंत गेल्यावरही ताप न शमल्यास गोवराच्या दुष्परिणामांची शक्यता वाढू शकते. त्यामुळे आधीच डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरते.