शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

नाशिक : गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि ...

नाशिक : गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि नंतर अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. मात्र, आदिवासी भागासह अन्य कारणांमुळे कुपोषित बालकांमध्ये गोवरच्या अनेक दुष्परिणामांसह जिवाचा धोकादेखील संभवतो.

पूर्वी गोवर साधारणपणे दर दोन-तीन वर्षांनी साथीच्या स्वरूपात येत असे. आता गोवर लसीमुळे साथ कमी झाली आहे. आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षे वयातच येऊन जातो; पण तो उशिराही येऊ शकतो. गोवर एकदा येऊन गेला, की जवळजवळ आयुष्यभर गोवरविरुध्द टिकणारी प्रतिकारशक्ती देऊन जातो. म्हणून त्या व्यक्तीला परत गोवर होत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला गोवर झालेला नसेल तर आयुष्यात कधीही तो होऊ शकतो. गोवर उशिराच्या वयात येणे जास्त त्रासदायक असते. मात्र, आता सुदैवाने गोवरविरुध्द परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. काही पालक मुलाला पूर्वी एकदा गोवर होऊनही काही मुलांना पुन्हा ‘गोवर’ निघाला असे सांगतात. बहुधा हे आजार गोवरसदृश इतर विषाणूंमुळे असतात.

इन्फो

गोवर होण्याचे कारण

गोवर हा रोग विषाणूमुळे होतो. हा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर आपल्यासारख्या उष्ण वातावरणात फार काळ तग धरू शकत नाही; पण थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो. म्हणून हिवाळ्यात हा आजार जास्त बळावतो. गोवरचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणुप्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवरची लक्षणे दिसू लागतात. गोवरचे विषाणू श्वसनावाटे प्रवेश करतात. सगळ्यात जास्त दुष्परिणाम श्वासनलिकेच्या आतल्या भागात होतो. म्हणूनच गोवरमध्ये खोकला येतो. बऱ्याच वेळा पुढे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. त्वचेवर उठणारे पुरळ हे सूक्ष्म केशवाहिन्यांना येणाऱ्या सुजेमुळे उठतात.

इन्फो

गोवरचे रोगनिदान

शरीरात एकदा विषाणूचा प्रवेश झाला की ८ ते १२ दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला आदी त्रास जाणवतो.

या काळात मोहरीएवढे लालसर ठिपके तोंडात गालाच्या अंतर्भागावर दिसतात. हे ठिपके म्हणजे गोवरची हमखास आढळणारी खूण आहे. पण एक-दोन दिवसांत हे ठिपके जातात. त्यामुळे रोगनिदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही. ठिपके दिसले तर मात्र गोवर आहे हे निश्चित होते.

इन्फो

...तर डॉक्टरांना दाखवा

पुरळ ज्या क्रमाने येते त्याच क्रमाने वरून खाली नाहीसे होतात. काही दिवस पुरळांच्या जागी खुणा राहतात. वाढत जाणारा ताप पुरळ उठायचे थांबल्यावर लगेच शमतो. तोंडातील पुरळांमुळे काही खाता येत नाही, भूक मंदावते. सर्वसाधारणपणे पुरळ निघायला सुरुवात झाल्यापासून सहा-सात दिवसांत मूल बरे होते. ताप उतरून नंतर पुन्हा येऊ लागल्यास किंवा पुरळ पायांपर्यंत गेल्यावरही ताप न शमल्यास गोवराच्या दुष्परिणामांची शक्यता वाढू शकते. त्यामुळे आधीच डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरते.