शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नासाकासाठी उपोषण

By admin | Updated: August 27, 2016 00:18 IST

लिलाव होण्याची भीती : सोमवारी मंत्रालयात बैठक

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आल्यामुळे कर्जाच्या खायीत अडकलेला हा कारखाना भविष्यात लिलावाद्वारे विक्री होण्याची भीती व्यक्त करीत कारखान्याचे कर्मचारी, सभासद व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून, कारखाना सुरू राहण्यासाठी काय उपायोजना करता येतील यावर विचार करण्यासाठी सोमवारी मंत्रालयात बैठक बोलविण्यात आली आहे. या संदर्भात ज्येष्ठ सभासद पां. भा. करंजकर व साखर कारखाना महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ. भास्करराव गोडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नाशिक जिल्हा बॅँकेकडून कारखान्याने वेळोवेळी कर्ज घेऊन कारखाना उर्जितावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला व त्यापोटी कोट्यवधी रुपये व्याजापोटी भरले. आता मात्र बॅँकेने कारखान्याला एनपीएत टाकून कर्ज देण्यास नकार दिला आहे. मुळात २०११-१२ या साली जिल्हा बॅँकेचे ६५ कोटी इतके कर्ज होते व कारखान्याकडे दीड लाख साखरेची पोती शिल्लक होती. खुल्या बाजारात साखर साडेतीन हजार रुपये क्विंटल असताना बॅँकेने बाराशे ते सोळाशे या दराने साखर विक्री केली. ३५ कोटी रुपये किमतीची साखर अवघ्या १८ कोटी रुपयांना विकली गेली. यात भ्रष्टाचार झाला असून, आता कारखान्याला एनपीएत टाकून प्रशासक नेमण्यात आल्याने भविष्यात हा कारखाना लिलावाद्वारे विक्री करून बॅँक आपली रक्कम वसूूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. साडेतीनशे कोटी रुपयांची मालमत्ता कारखान्याकडे असून, ती तारण ठेवून जिल्हा बॅँकेने पुन्हा कर्ज द्यावे, तीन वर्षांपासून कामगारांचे वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी थकली असून, ती त्वरित मिळावी अशी मागणीही त्यांनी केली. नाशिक, सिन्नर व इगतपुरी अशा तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला कारखाना वाचविण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, कर्मचारी, सभासदांच्या आंदोलनाची दखल घेत, सोमवारी सहकारमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविली असून, त्यात काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)