शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

ग्रामीण बळींमध्ये महापालिका क्षेत्रापेक्षाही वेग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST

नाशिक : कोरोनाच्या प्रारंभापासून बळींच्या संख्येत कोरोना बळींचा वेग सातत्याने नाशिक शहरात अधिक राहिला आहे. मात्र गत आठवड्याच्या ...

नाशिक : कोरोनाच्या प्रारंभापासून बळींच्या संख्येत कोरोना बळींचा वेग सातत्याने नाशिक शहरात अधिक राहिला आहे. मात्र गत आठवड्याच्या उत्तरार्धात दोन वेळा ग्रामीणचे बळी शहरापेक्षा जास्त आणि एकदा एकसमान झाल्याने चिंतेत भर पडली आहे. नाशिक महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील बळींमधील फरकदेखील केवळ शंभरवर आल्याने एकूण मृत्यूंमध्ये ग्रामीण भाग महापालिकेला ओलांडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ग्रामीण क्षेत्रात मिळून १ हजार १०२ बळी, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार २४५ मृत्यूंची नोंद झाली आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून २१८ व जिल्हा बाह्य ८६ अशा एकूण २ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ५४२ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत ३७ हजार १०७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत २ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ९७२, चांदवड १ हजार १४५, सिन्नर १ हजार ३४०, दिंडोरी ८३८, निफाड २ हजार ३१३, देवळा १ हजार ३२९, नांदगाव ८२५, येवला ४१८, त्र्यंबकेश्वर ३९४, सुरगाणा २१७, पेठ ९५, कळवण ६२०, बागलाण १ हजार २८८, इगतपुरी ५६४, मालेगाव ग्रामीण ९४८ अशा एकूण १३ हजार ३०६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ५५६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८३५, तर जिल्ह्याबाहेरील ४१० असे एकूण ३७ हजार १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रविवारपर्यंत जिल्ह्यात २ लाख २६ हजार ३०० रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८२ वर

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८०.५२ टक्के, नाशिक शहरात ८३.६५ टक्के, मालेगावमध्ये ७८.८० टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.३२ टक्के आहे. सरासरी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ८२.४३ टक्के घसरण झाली आहे.