शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 4, 2017 00:04 IST

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यावर अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त होणार अशी आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा अध्यादेश निघाल्यानंतर शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. याच निराशेतून तालुक्यातील सोनजांब येथील माधव बळवंत जाधव (७२) या कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली . त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली असा परिवार आहे.सोनजांब येथील माधव बळवंत जाधव या शेतकऱ्याने २०१० - ११ मध्ये सोसायटीकडून द्राक्षबागेसाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र दरम्यानच्या काळात दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे ते कर्जफेड करू शकले नाहीत. यंदा द्राक्षाचे चांगले पीक आले मात्र द्राक्षाला भाव मिळाला नाही. त्यामुळे ते कर्ज फेडू शकले नाहीत. सोसायटीचा वसुलीसाठी सातत्याने तगादा सुरू होता. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण कर्जमाफ होईल ही आशा होती. मात्र कर्जमाफीचा अध्यादेश निघाल्यावर त्यांची घोर निराशा झाली. जाधव यांचे कर्ज २०१२ पूर्वीचे असल्याने त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नव्हता या निराशेतून माधव जाधव यांनी गुरुवार (दि.२९) सायंकाळी चारच्या दरम्यान द्राक्षबागेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांचेवर उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.