शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

शेतकऱ्यांचा महावितरणपुढे ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:39 IST

वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित ...

वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे कनाशी पश्चिम पट्ट्यातील संतप्त शेतकऱ्यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली कळवणच्या महावितरण कार्यालयासमोर तासभर ठिय्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

दरम्यान आमदार नितीन पवार यांनी पिंपळे खुर्द येथे नव्याने उभारलेले वीज उपकेंद्र तात्काळ सुरु करुन तेथून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना महावितरणच्या यंत्रणेला केल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

कळवण तालुक्यातील कृषी पंपाची वीजेची मागणी वाढली असल्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. कळवण तालुक्यात पाण्याअभावी पिके वाळण्याची भिती आहे. शेतकरी महावितरणचे वेळेवर वीज बिल भरत असून सुरळीत व अखंड वीज पुरवठा मिळत नसल्याने महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष आहे.

इन्फो

उपाययोजनांची मागणी

सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतात पीक उभे आहे . वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्यामुळे पाण्याअभावी पिके हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. नव्याने कार्यन्वित करण्यात येणाऱ्या पिंपळे खुर्द वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा कार्यन्वित केल्यास अन्य भागातील वीजेचा दाब कमी होण्यास मदत होऊन तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

फोटो- १८ कळवण आंदोलन

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कळवण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले शेतकरी.

===Photopath===

180221\18nsk_46_18022021_13.jpg

===Caption===

फोटो- १८ कळवण आंदोलनसुरळीत वीजपुरवठ्यासाठी कळवण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले शेतकरी.