शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शेतकऱ्यांचा महावितरणपुढे ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:39 IST

वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित ...

वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे कनाशी पश्चिम पट्ट्यातील संतप्त शेतकऱ्यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली कळवणच्या महावितरण कार्यालयासमोर तासभर ठिय्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

दरम्यान आमदार नितीन पवार यांनी पिंपळे खुर्द येथे नव्याने उभारलेले वीज उपकेंद्र तात्काळ सुरु करुन तेथून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना महावितरणच्या यंत्रणेला केल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

कळवण तालुक्यातील कृषी पंपाची वीजेची मागणी वाढली असल्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. कळवण तालुक्यात पाण्याअभावी पिके वाळण्याची भिती आहे. शेतकरी महावितरणचे वेळेवर वीज बिल भरत असून सुरळीत व अखंड वीज पुरवठा मिळत नसल्याने महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष आहे.

इन्फो

उपाययोजनांची मागणी

सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतात पीक उभे आहे . वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्यामुळे पाण्याअभावी पिके हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. नव्याने कार्यन्वित करण्यात येणाऱ्या पिंपळे खुर्द वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा कार्यन्वित केल्यास अन्य भागातील वीजेचा दाब कमी होण्यास मदत होऊन तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

फोटो- १८ कळवण आंदोलन

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कळवण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले शेतकरी.

===Photopath===

180221\18nsk_46_18022021_13.jpg

===Caption===

फोटो- १८ कळवण आंदोलनसुरळीत वीजपुरवठ्यासाठी कळवण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले शेतकरी.