शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे ...

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे स्टेशन यामुळे नाशिकच्या शेती क्षेत्राचा विकास होण्याच्या खूप संधी आहेत. याशिवाय नाशिकचे शेतकरी प्रयोगशील आणि धाडसी निर्णय घेणारे आहेत. यामुळेच आज नाशिकची द्राक्ष जागतिक पातळीवर पोहोचली आहेत. द्राक्ष, डाळिंब, कांदा, टमाटा ही नाशिकची प्रमुख पिकं असून, या पिकांच्या निर्यातीत नाशिक आघाडीवर आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये ५० टक्के वाटा नाशिकचा असल्याने नाशिकच्या शेती क्षेत्राचे भविष्य चांगले आहे. म्हणूनच आगामी पाच-सहा वर्षांत शेती क्षेत्रात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाजही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पूर्वी तंत्रज्ञान, भांडवल, गुणवत्ता या गोष्टींचा शेती क्षेत्रात अभाव होता. पण हे तीनही घटक आता शेती क्षेत्रात येत आहेत. आता लहान्या शेतकऱ्यांसह सर्वांनीच एकत्र येत आपली तडजोडीची क्षमता वाढविली पाहिजे. यासाठी पीकनिहाय शेतकरी गट तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी सहकारी संस्था, बाजार समित्या ही ६०-७०च्या दशकातली गरज होती. काळानुरूप झालेल्या बदलामुळे या संस्था आता कालबाह्य ठरू लागल्या असून, डिजिटलायझेशनमुळे शेतकऱ्यांना अनेक बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

चौकट-

शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधी

एखाद्या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करूनही फारशा नोकऱ्या तयार होत नाहीत. त्याउलट शेती क्षेत्रात कमी गुंतवणूक करूनही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. एकट्या द्राक्ष शेतीतून पाच लाख नोकऱ्या निर्माण होतात आणि द्राक्षबाग उभी करण्यास गुंतवणूक अल्पशी लागते, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

चौकट-

आजकाल शेतीचा राजकारणासाठी वापर होतो. सर्व शेतकरी एकत्र येणे म्हणजे संघटन नव्हे तर पीकनिहाय शेतकरी एकत्र आल्यास त्यांची वेगळी ताकद निर्माण होते. अशा गटांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि प्रस्थापितांना बाजूला सारण्यासाठी शेतकऱ्यांमधून व्यावसायिक नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे मत विलास शिंदे यांनी व्यक्त केले.