शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे ...

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे स्टेशन यामुळे नाशिकच्या शेती क्षेत्राचा विकास होण्याच्या खूप संधी आहेत. याशिवाय नाशिकचे शेतकरी प्रयोगशील आणि धाडसी निर्णय घेणारे आहेत. यामुळेच आज नाशिकची द्राक्ष जागतिक पातळीवर पोहोचली आहेत. द्राक्ष, डाळिंब, कांदा, टमाटा ही नाशिकची प्रमुख पिकं असून, या पिकांच्या निर्यातीत नाशिक आघाडीवर आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये ५० टक्के वाटा नाशिकचा असल्याने नाशिकच्या शेती क्षेत्राचे भविष्य चांगले आहे. म्हणूनच आगामी पाच-सहा वर्षांत शेती क्षेत्रात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाजही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पूर्वी तंत्रज्ञान, भांडवल, गुणवत्ता या गोष्टींचा शेती क्षेत्रात अभाव होता. पण हे तीनही घटक आता शेती क्षेत्रात येत आहेत. आता लहान्या शेतकऱ्यांसह सर्वांनीच एकत्र येत आपली तडजोडीची क्षमता वाढविली पाहिजे. यासाठी पीकनिहाय शेतकरी गट तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी सहकारी संस्था, बाजार समित्या ही ६०-७०च्या दशकातली गरज होती. काळानुरूप झालेल्या बदलामुळे या संस्था आता कालबाह्य ठरू लागल्या असून, डिजिटलायझेशनमुळे शेतकऱ्यांना अनेक बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

चौकट-

शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधी

एखाद्या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करूनही फारशा नोकऱ्या तयार होत नाहीत. त्याउलट शेती क्षेत्रात कमी गुंतवणूक करूनही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. एकट्या द्राक्ष शेतीतून पाच लाख नोकऱ्या निर्माण होतात आणि द्राक्षबाग उभी करण्यास गुंतवणूक अल्पशी लागते, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

चौकट-

आजकाल शेतीचा राजकारणासाठी वापर होतो. सर्व शेतकरी एकत्र येणे म्हणजे संघटन नव्हे तर पीकनिहाय शेतकरी एकत्र आल्यास त्यांची वेगळी ताकद निर्माण होते. अशा गटांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि प्रस्थापितांना बाजूला सारण्यासाठी शेतकऱ्यांमधून व्यावसायिक नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे मत विलास शिंदे यांनी व्यक्त केले.