शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे ...

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे स्टेशन यामुळे नाशिकच्या शेती क्षेत्राचा विकास होण्याच्या खूप संधी आहेत. याशिवाय नाशिकचे शेतकरी प्रयोगशील आणि धाडसी निर्णय घेणारे आहेत. यामुळेच आज नाशिकची द्राक्ष जागतिक पातळीवर पोहोचली आहेत. द्राक्ष, डाळिंब, कांदा, टमाटा ही नाशिकची प्रमुख पिकं असून, या पिकांच्या निर्यातीत नाशिक आघाडीवर आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये ५० टक्के वाटा नाशिकचा असल्याने नाशिकच्या शेती क्षेत्राचे भविष्य चांगले आहे. म्हणूनच आगामी पाच-सहा वर्षांत शेती क्षेत्रात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाजही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पूर्वी तंत्रज्ञान, भांडवल, गुणवत्ता या गोष्टींचा शेती क्षेत्रात अभाव होता. पण हे तीनही घटक आता शेती क्षेत्रात येत आहेत. आता लहान्या शेतकऱ्यांसह सर्वांनीच एकत्र येत आपली तडजोडीची क्षमता वाढविली पाहिजे. यासाठी पीकनिहाय शेतकरी गट तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी सहकारी संस्था, बाजार समित्या ही ६०-७०च्या दशकातली गरज होती. काळानुरूप झालेल्या बदलामुळे या संस्था आता कालबाह्य ठरू लागल्या असून, डिजिटलायझेशनमुळे शेतकऱ्यांना अनेक बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

चौकट-

शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधी

एखाद्या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करूनही फारशा नोकऱ्या तयार होत नाहीत. त्याउलट शेती क्षेत्रात कमी गुंतवणूक करूनही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. एकट्या द्राक्ष शेतीतून पाच लाख नोकऱ्या निर्माण होतात आणि द्राक्षबाग उभी करण्यास गुंतवणूक अल्पशी लागते, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

चौकट-

आजकाल शेतीचा राजकारणासाठी वापर होतो. सर्व शेतकरी एकत्र येणे म्हणजे संघटन नव्हे तर पीकनिहाय शेतकरी एकत्र आल्यास त्यांची वेगळी ताकद निर्माण होते. अशा गटांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि प्रस्थापितांना बाजूला सारण्यासाठी शेतकऱ्यांमधून व्यावसायिक नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे मत विलास शिंदे यांनी व्यक्त केले.