शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

किसान सभेचा मोर्चा धडकला

By admin | Updated: June 24, 2016 00:16 IST

विभागीय कार्यालय : पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ

नाशिकरोड : नाशिक विभाग वृक्षारोपण संदर्भात आढावा बैठकीस वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात येणार असल्याच्या माहितीनंतर नाशिक जिल्हा किसान सभेने हजारो आदिवासींना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक जिल्हा किसान सभेने वनाधिकार कायद्याची २००८ पासून चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी व इतर विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेने हजारो आदिवासी बांधवांचा गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. यापूर्वीच्या किसान सभेच्या आंदोलनाची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी व नियोजन केले होते.दरम्यान नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यात १ जुलै रोजी २ कोटी वृक्षाची लागवड करण्यात येणार असून त्यासंदर्भात नाशिक विभागाच्या आढावा बैठकीला वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगट्टीवार, गृहराज्यमंत्री राम शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे दुपारी ४ वाजेच्या सुमारास येणार असल्याची माहिती किसान सभेला मिळाली.पोलिसांची चांगलीच तारांबळकिसान सभेने हजारो आदिवासींना जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करताच आदिवासी बांधव, महिलांनी खचाखच भरलेली शेकडो वाहने दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकरोडच्या दिशेने निघाली. किसान सभेने ऐनवेळी मोर्चाचे ठिकाण बदलल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाणाऱ्या नाशिकरोड पोलीस ठाण्याशेजारील मेनगेट रस्त्यावर ५०० मीटर अगोदरच रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून रस्ता बंद केला. तसेच जेलरोड कोठारी कन्या शाळेशेजारून जाणारा रस्ता बंद केला. पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. खुद्द आयुक्त एस. जगन्नाथन हे घटनास्थळी दाखल झाले. किसान सभेचे पदाधिकारी व हजारो आदिवासी बांधव विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडविला. पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन द्यायचे आहे असे प्रशासनाला सांगितले. दुपारी ३.३० ते ५.३० पर्यंत मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. साडेचार वाजेच्या सुमारास भारत प्रतिभूती मुद्रणालय सुटल्यानंतर पोलिसांनी प्रेस कामगारांना विनंती करत दुसऱ्या मार्गावरून जाण्यास सांगितले. मोर्चेकरी शिष्टमंडळाची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा होऊन निवेदन दिल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मोर्चेकरी पुन्हा माघारीच्या दिशेने निघाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)