शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फुलली शेती

By admin | Updated: March 26, 2017 22:54 IST

सटाणा : जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांनी पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी श्रीपूरवडे पॅटर्न तयार करून नावारूपाला आणला आहे.

सटाणा : लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर कोणतेही अशक्य काम शक्य होऊ शकते. अशीच प्रबळ इच्छाशक्ती असलेले जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांनी पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी श्रीपूरवडे पॅटर्न तयार करून नावारूपाला आणला आहे. त्यामुळे आता शिरपूर नव्हे, तर श्रीपूरवडे पॅटर्न कसमादे पट्ट्यात रोल मॉडेल म्हणून पुढे आले आहे. या पॅटर्नमुळे बागलाण तालुक्यातील तब्बल सहा गावे ओलिताखाली येऊन बागायती क्षेत्रात एक हजार हेक्टरहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे शेतशिवार पिकांनी फुलू लागले असून, हिरवाईने नटले आहे.  बागलाण तालुक्यातील जायखेडा गट हा मोसम आणि करंजाडी या दोन नद्यांमुळे सुपीक मानला जात असला, तरी पावसाचा लहरीपणा, धरणामधील पिण्यासाठी आरक्षित झालेला पाणीसाठा यामुळे हा सुपीक परिसर पाण्याअभावी अक्षरश: उजाड होत चालला होता. या गटातील उत्राणे, श्रीपूरवडे, टिंगरी, वाघळे, राजपूरपांडे, खामलोण, तळवाडे ही गावे अक्षरश: टॅँकरग्रस्त झाली होती. टंचाईच्या झळांनी हा परिसर होरपळून निघत होता. या गटाचे जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांनी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून शासनदरबारी मोठा प्रकल्प न मागता लहान लहान प्रकल्प तयार करण्यावर भर दिला. तब्बल दोन वर्षे पाठपुरावा करून विविध योजनांमधून टिंगरी, श्रीपूरवडे, उत्राणे गावांमधून जाणाऱ्या भिवरी नाल्यामधून मोसम नदीत वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी तब्बल पंधरा सीमेंट प्लग बंधारे साखळी पद्धतीने बांधले. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे तब्बल बेचाळीस दशलक्ष घनफूट पाणी अडविण्यात यश मिळाले आहे. श्रीपूरवडे पॅटर्नमुळे फुलले शेतशिवार...जायखेडा गटातील प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रामाणिकपणे पावले उचलत आहोत. तसा कृती आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला आपण गटातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला, जेणेकरून दळणवळण सुरळीत होईल. त्यासाठी यंदा जनतेच्या मागणीनुसार करंजाड-भुयाणे-निताणे-बिजोटे-आखतवाडे-आनंदपूर-आसखेडा या सोळा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी चार कोटींचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार हीना गावित यांच्या माध्यमातून प्रलंबित हिंदळबारीच्या कामासाठी साडेसहा कोटींचा निधी मिळविला आहे. (वार्ताहर)प्रभावीपणे सिंचन योजना राबवून बागलाणमध्ये नव्याने श्रीपूरवडे पॅटर्न आता नावारूपाला आला आहे. याच पॅटर्नमधून नालाजोड संकल्पनादेखील पगार यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे. भिवरी नाला ओव्हरफुल झाल्यानंतर वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी उत्राणे, तळवाडे, खामलोण शिवारात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पगार यांनी सेसच्या निधीमधून भिवरी नाल्याचे पाणी आवळाई नाल्यात टाकून नालाजोड प्रकल्प यशस्वी केला. आज श्रीपूरवडे पॅटर्नमुळे तब्बल बेचाळीस दशलक्ष घनफुटाहून अधिक पाणी अडवले गेल्यामुळे टिंगरी, श्रीपूरवडे, वाघळे, राजपूरपांडे, उत्राणे, तळवाडे, खामलोण शेतशिवारातील भूगर्भ पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे कोरड्या झालेल्या विहिरी पाण्याने भरून यंदा एक हजार हेक्टरहून शेतजमीन ओलिताखाली आली आहे. यामुळे संपूर्ण शेतशिवार पिकांनी फुलू लागले आहे.