शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शेतकऱ्यांना पेन्शनसाठी किसान सभेचे उपोषण

By admin | Updated: September 3, 2014 00:22 IST

शेतकऱ्यांना पेन्शनसाठी किसान सभेचे उपोषण

 

नाशिक : काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसह विविध प्रकारच्या १६ प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीनदिवसीय बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील प्रत्येक शेतकरी व शेतमजूर तसेच असंघटित कामगारांना दरमहा ३ हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे व वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्यांना पेन्शन देण्यात यावी. यासाठी राज्य व केंद्र शासनाने वाटा उचलावा ही प्रमुख मागणी किसान सभेने केली आहे. त्याचप्रमाणे भूसंपादन कायदा संमत झाला असून, त्यानुसार ७० टक्के शेतकऱ्यांची सहमती असल्याशिवाय भूसंपादन करू नये, शेतीमालाला आधारभूत किंमत देण्यात यावी, त्यासाठी स्वामिनाथन आयोगाची शिफारस अमलात आणावी, राष्ट्रीय बजेटच्या १० टक्के रक्कम शेतीवर खर्च करण्यात यावी, कृषी मंत्रालयाचे नाव बदलून त्याऐवजी शेती व शेतकरी कल्याण मंत्रालय,असे करण्यात यावे, राष्ट्रीय व राज्य शासनाने शेतीविषयक स्वतंत्र बजेट सादर करावे आदि मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. उपोषणात राजू देसले, विष्णुपंत गायखे, व्ही. डी. धनवटे, प्रमोद अपसुंदे, चेतन पनेर, विष्णू जाधव, पंढरीनाथ कोल्हे, भाऊसाहेब शिंदे, संजय बैरागी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)