शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

शेतकऱ्यांनी केले पेरणी आंदोलन

By admin | Updated: July 30, 2016 00:12 IST

गिसाका : पेरणी करुन केली जमीन परतीची मागणी

 गिसाका : गिसाका स्थापनेसाठी दाभाडीच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. परिसराचा विकास होऊन युवकांना रोजगार उपलब्ध होईल हा हेतू कारखाना उभारण्यामागे होता. मात्र हा कारखाना आर्मस्ट्रॉँग कंपनीने कवडीमोल भावात विकत घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप महाराष्ट्र सहकार बचाव व गिसाका बचाव समितीने केला. यावेळी शेतकऱ्यांनी गिसाकाच्या जमिनीत पेरणी करून आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी आंदोलन केले.महाराष्ट्र सहकार बचाव समितीचे यशवंत अहिरे, प्रा. के. एन. अहिरे, डॉ. सुगन बरंठ यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आले. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही आदि घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. शिवाजी महाराज व भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रा. के. एन. अहिरे म्हणाले की, आर्मस्ट्रॉँग कंपनीने गिरणा कारखान्याची जमीन तारण ठेवून कर्ज काढले. १२ जानेवारी २०१२ रोजी नाशिक जिल्हा सह. बॅँकेकडून ३० कोटींचा बोजा चढवून १५ कोटींचे कर्ज घेतले. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१४ रोजी नाशिक मर्चंट्स बॅँकेकडे २५ कोटींचा बोजा चढवून साडेबारा कोटी कर्ज घेतले. त्यामुळे या जमिनीवर साडेसत्तावीस कोटींचा बोजा चढविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तरी इडीने त्वरित कार्यवाही करून आर्मस्ट्रॉँग कंपनीकडून घेऊन गिसाका सभासद व शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असेही प्रा. अहिरे म्हणाले. सातबारावर पीकपाणी लावण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी यशवंत अहिरे, दशरथ बाबूराव निकम, देवबा निकम, डॉ. सुगन बरंठ, अरुण पाटील, विशाल निकम यांची भाषणे झाली. ही लढाई दीर्घकाळ चालणारी असल्याने सर्वांनी संघटितपणे लढा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या आंदोलनाप्रसंगी शिवाजी पाटील, उत्तम निकम, उदय हिरे, महेश निकम, पंडित धांडे, बबन कापडणीस, पंडित चव्हाण, सुधाकर निकम, विशाल निकम, दादा पवार, जे. एम. निकम, पुष्पा निकम, दादाजी अहिरे, के. डी. पगारे, सी. बी. शेलार, नानाजी निकम, भगवान अहिरे आदिंसह परिसरातील शेतकरी, सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)