शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

कांद्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:31 IST

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

सायखेडा : (बाजीराव कमानकर ) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करत असतात मात्र चाळीमध्ये जागा नसल्याने उरलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला जातो. निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. उन्हाळ कांदा अवघा ४०० ते ६०० रु पये भावाने व्यापारी खरेदी करतात इतक्या कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़ महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. बियाणे, रोप तयार करणे, शेतीची मशागत करणे, खते देणे औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. शिवाय शेतकºयांना चार महिने पाणी द्यावे लागते, इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल भावाने विक्री होत असल्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे.कांदा शेतकºयांना अनेकदा रडायला लावतो. यंदा मात्र कोरोना रोगाचे संकट त्यात कोसळणारे भाव यामुळे शेतकरी मोठा अडचणी सापडला आहेशेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ झाली की निर्यातबंदी,शासन नियमात बदल, आंदोलन, संप अशा विविध अडचणीत हमखास येतात़-----------------------------क्विंटलला ५०० ते ६०० रुपये दरनिफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहातील; मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.-------------------------ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते त्यामुळे उत्पादक घटले एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाले. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक रहातील मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही.- चंद्रकांत रायते, शेतकरी, शिंगवे-----------------------कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधन यामुळे कांद्याचा बाजारभावात चढउतार होत असतो. सद्या कोरोनामुळे वाहतूक अडचणी वाढल्या आहे. शेतकºयांना चार पैसे मिळाले तर त्यात व्यापाºयालासुद्धा मिळतात त्यामुळे चार पैसे मिळून शेतकरी समाधानी राहावा, असा विचार व्यापारीवर्गाचा असतो; पण वेगवेगळ्या कारणामुळे बाजारभाव पडतात त्याचा फटका शेतकºयांना आणि व्यापारी या दोघांना बसतो. - अनंत भुतडा, कांदा व्यापारी, सायखेडा

टॅग्स :Nashikनाशिक