शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:31 IST

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

सायखेडा : (बाजीराव कमानकर ) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करत असतात मात्र चाळीमध्ये जागा नसल्याने उरलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला जातो. निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. उन्हाळ कांदा अवघा ४०० ते ६०० रु पये भावाने व्यापारी खरेदी करतात इतक्या कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़ महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. बियाणे, रोप तयार करणे, शेतीची मशागत करणे, खते देणे औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. शिवाय शेतकºयांना चार महिने पाणी द्यावे लागते, इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल भावाने विक्री होत असल्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे.कांदा शेतकºयांना अनेकदा रडायला लावतो. यंदा मात्र कोरोना रोगाचे संकट त्यात कोसळणारे भाव यामुळे शेतकरी मोठा अडचणी सापडला आहेशेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ झाली की निर्यातबंदी,शासन नियमात बदल, आंदोलन, संप अशा विविध अडचणीत हमखास येतात़-----------------------------क्विंटलला ५०० ते ६०० रुपये दरनिफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहातील; मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.-------------------------ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते त्यामुळे उत्पादक घटले एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाले. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक रहातील मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही.- चंद्रकांत रायते, शेतकरी, शिंगवे-----------------------कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधन यामुळे कांद्याचा बाजारभावात चढउतार होत असतो. सद्या कोरोनामुळे वाहतूक अडचणी वाढल्या आहे. शेतकºयांना चार पैसे मिळाले तर त्यात व्यापाºयालासुद्धा मिळतात त्यामुळे चार पैसे मिळून शेतकरी समाधानी राहावा, असा विचार व्यापारीवर्गाचा असतो; पण वेगवेगळ्या कारणामुळे बाजारभाव पडतात त्याचा फटका शेतकºयांना आणि व्यापारी या दोघांना बसतो. - अनंत भुतडा, कांदा व्यापारी, सायखेडा

टॅग्स :Nashikनाशिक