शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

कांद्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:31 IST

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

सायखेडा : (बाजीराव कमानकर ) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करत असतात मात्र चाळीमध्ये जागा नसल्याने उरलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला जातो. निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. उन्हाळ कांदा अवघा ४०० ते ६०० रु पये भावाने व्यापारी खरेदी करतात इतक्या कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़ महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. बियाणे, रोप तयार करणे, शेतीची मशागत करणे, खते देणे औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. शिवाय शेतकºयांना चार महिने पाणी द्यावे लागते, इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल भावाने विक्री होत असल्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे.कांदा शेतकºयांना अनेकदा रडायला लावतो. यंदा मात्र कोरोना रोगाचे संकट त्यात कोसळणारे भाव यामुळे शेतकरी मोठा अडचणी सापडला आहेशेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ झाली की निर्यातबंदी,शासन नियमात बदल, आंदोलन, संप अशा विविध अडचणीत हमखास येतात़-----------------------------क्विंटलला ५०० ते ६०० रुपये दरनिफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहातील; मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.-------------------------ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते त्यामुळे उत्पादक घटले एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाले. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक रहातील मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही.- चंद्रकांत रायते, शेतकरी, शिंगवे-----------------------कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधन यामुळे कांद्याचा बाजारभावात चढउतार होत असतो. सद्या कोरोनामुळे वाहतूक अडचणी वाढल्या आहे. शेतकºयांना चार पैसे मिळाले तर त्यात व्यापाºयालासुद्धा मिळतात त्यामुळे चार पैसे मिळून शेतकरी समाधानी राहावा, असा विचार व्यापारीवर्गाचा असतो; पण वेगवेगळ्या कारणामुळे बाजारभाव पडतात त्याचा फटका शेतकºयांना आणि व्यापारी या दोघांना बसतो. - अनंत भुतडा, कांदा व्यापारी, सायखेडा

टॅग्स :Nashikनाशिक