शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

नवीन वर्षात विद्यार्थिनींची राहण्याची होणार सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:49 IST

ग्रामीण भागात शैक्षणिक सोयींच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची बाब लक्षात आली आहे. त्यात गावापासून शाळा दूर असणे, शाळेत जाण्यासाठी बस, वाहनाची सोय नसणे,

ठळक मुद्देकस्तुरबा गांधी विद्यालय : रिक्त पदे भरण्याची कार्यवाहीइगतपुरी व पेठ तालुक्यांत विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी नवीन इमारत बांधण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यातील विद्यार्थिनींची शैक्षणिक गळती रोखण्याबरोबरच त्यांना शिक्षण व निवासाची सोय करणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात यंदा नवीन शैक्षणिक वर्षापासून इगतपुरी व पेठ तालुक्यातील वसतिगृहात सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील अति दुर्गम भागातील विद्यार्थिनींना बारावीपर्यंत शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामीण भागात शैक्षणिक सोयींच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची बाब लक्षात आली आहे. त्यात गावापासून शाळा दूर असणे, शाळेत जाण्यासाठी बस, वाहनाची सोय नसणे, आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शैक्षणिक खर्च करण्याची कुवत नसणे, आई-वडील शेतीकाम करीत असताना घर सांभाळणे अशा अनेक कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून शासनाने काही वर्षांपूर्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या शिक्षणाची व निवासाची सोय करण्यात येते त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमध्ये प्रायोगिक पातळीवर हा प्रयोग राबविण्यात येऊन साधारणत: चारशे विद्यार्थिनींची सोय करण्यात आली होती. इगतपुरी व पेठ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच अशी व्यवस्था करण्यात आली होती. या योजनेस ग्रामीण भागातील व विशेषत: आदिवासी विद्यार्थिनींचा मिळणारा प्रतिसाद पाहता, इगतपुरी व पेठ तालुक्यांत विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे, तर सुरगाणा व त्र्यंबक तालुक्यांत अनुक्रमे आदर्श समता शिक्षण संस्था व ग्रामोदय शिक्षण प्रसारक या खासगी शिक्षण संस्थांकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.इगतपुरी व पेठ येथील वसतिगृहाचे काम पूर्ण झाल्याने जून महिन्यापासून या दोन्ही तालुक्यांतील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या निवासाची सोय होणार असल्यामुळे या वसतिगृहातील विद्यार्थिनींची काळजी घेण्यासाठी गृहप्रमुख, मुख्य स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, चौकीदार असे विविध पदे भरण्यास शासनाने अनुमती दिली आहे. येत्या काही दिवसांत ही पदे भरली गेल्यास वसतिगृहासाठी विद्यार्थिनींच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducationशिक्षण