शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

‘वंचित’चा दुणावलेला उत्साह विधानसभेत विरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:40 IST

लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही.

लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही. जिल्ह्यात आठ ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी निवडणूक लढविली मात्र त्यापैकी दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवारांनी १० ते १२ हजारांची मते घेतली पण त्यांचा प्रभाव कुठेही दिसून आला नाही.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वंचित आघाडीकडून कोण उमेदवारी करणार याविषयीची जिल्ह्यात चांगली चर्चा होती. विशेषत: आघाडी, युतीकडून संधी हुकलेले अनेक दिग्गज वंचित आघाडीच्या गळाला लागतील अशी शक्यता निर्माण झाली होती. किंबहुना काही नावांची चर्चादेखील पसरविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने ऐनवेळी निवडीची वेळ निघून गेल्याने मागणी केलेल्या उमेदवारांना तिकीट द्यावे लागले आणि जिल्ह्यात केवळ आठच उमेदवार त्यांना उभे करता आले. वास्तविक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याचे पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते; मात्र उमेदवारी जाहीर करताना विजयाचे निकष दुर्लक्षित करून जागा लढविणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आणि वंचित निवडणुकीला सामोरे गेली. प्रचारातील त्यांचा उत्साह मात्र दिसून आला नाही.लोकसभा निवडणुकीत २८ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन देवळालीतून वंचितने चांगले वातावरण निर्माण केले होते; मात्र विधानसभा निवडणूक लढविण्यास येथून कुणीच तयार नसल्याने वंचितपूर्ण पेच निर्माण झाला होता. शहर आणि जिल्ह्यातूनही बºयाच नावांची चर्चा झाली मात्र ऐनवेळी नवख्या उमेदवारांच्या गळ्यात माळ टाकण्यात आल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यापासूनची तयारी उमेदवारांना करावी लागली याचा फटका उमेदवारांना बसला. जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते अ‍ॅड. आंबेडकर यांची सभा ऐनवळी रद्द करण्यात आल्यामुळेदेखील कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. वंचितकडून प्रचाराचे कोणतेही नियोजन दिसून आले नाही, उमेदवारांना आपापल्या कुवतीनुसार प्रचार करावा लागला. त्यानुसार त्यांना मतेही मिळाली. लोकसभेत वंचितने ज्याप्रमाणे वातावरण निर्मिती केली होती त्या तुलनेत विधानसभेत त्यांच्यात उत्साह दिसून आलाच नाही. जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची भूमिकाही स्पष्ट नसल्यामुळे उमेदवारांना ऐनवेळी स्वबळावर लढावे लागले. त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात वंचितला पाहिजे तेवढी चर्चा घडवून आणता आली नाही.

टॅग्स :Politicsराजकारण