शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

‘वंचित’चा दुणावलेला उत्साह विधानसभेत विरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:40 IST

लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही.

लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही. जिल्ह्यात आठ ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी निवडणूक लढविली मात्र त्यापैकी दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवारांनी १० ते १२ हजारांची मते घेतली पण त्यांचा प्रभाव कुठेही दिसून आला नाही.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वंचित आघाडीकडून कोण उमेदवारी करणार याविषयीची जिल्ह्यात चांगली चर्चा होती. विशेषत: आघाडी, युतीकडून संधी हुकलेले अनेक दिग्गज वंचित आघाडीच्या गळाला लागतील अशी शक्यता निर्माण झाली होती. किंबहुना काही नावांची चर्चादेखील पसरविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने ऐनवेळी निवडीची वेळ निघून गेल्याने मागणी केलेल्या उमेदवारांना तिकीट द्यावे लागले आणि जिल्ह्यात केवळ आठच उमेदवार त्यांना उभे करता आले. वास्तविक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याचे पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते; मात्र उमेदवारी जाहीर करताना विजयाचे निकष दुर्लक्षित करून जागा लढविणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आणि वंचित निवडणुकीला सामोरे गेली. प्रचारातील त्यांचा उत्साह मात्र दिसून आला नाही.लोकसभा निवडणुकीत २८ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन देवळालीतून वंचितने चांगले वातावरण निर्माण केले होते; मात्र विधानसभा निवडणूक लढविण्यास येथून कुणीच तयार नसल्याने वंचितपूर्ण पेच निर्माण झाला होता. शहर आणि जिल्ह्यातूनही बºयाच नावांची चर्चा झाली मात्र ऐनवेळी नवख्या उमेदवारांच्या गळ्यात माळ टाकण्यात आल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यापासूनची तयारी उमेदवारांना करावी लागली याचा फटका उमेदवारांना बसला. जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते अ‍ॅड. आंबेडकर यांची सभा ऐनवळी रद्द करण्यात आल्यामुळेदेखील कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. वंचितकडून प्रचाराचे कोणतेही नियोजन दिसून आले नाही, उमेदवारांना आपापल्या कुवतीनुसार प्रचार करावा लागला. त्यानुसार त्यांना मतेही मिळाली. लोकसभेत वंचितने ज्याप्रमाणे वातावरण निर्मिती केली होती त्या तुलनेत विधानसभेत त्यांच्यात उत्साह दिसून आलाच नाही. जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची भूमिकाही स्पष्ट नसल्यामुळे उमेदवारांना ऐनवेळी स्वबळावर लढावे लागले. त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात वंचितला पाहिजे तेवढी चर्चा घडवून आणता आली नाही.

टॅग्स :Politicsराजकारण