देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने सातपूर येथील जेसीआय नाशिक न्यू गोदावरी, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे व क्षेत्रीय प्रचार कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आनंद तरंग फाउंडेशनच्या कलावंतांनी शाहिरी बाण्याने सैनिकांची आणि देशाच्या शौर्याची यशोगाथा सादर केली. करगिलच्या युद्धामध्ये आपले दोन्ही पाय व एक हात गमावलेल्या मेजर दीपचंद नायक यांनी कारगिलचा धगधगता इतिहास डोळ्यासमोर उभा केला. तर माजी सैनिक विजय कातोरे यांनी सैनिकांची जीवनगाथा मांडली. प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक हरीष चौबे, अनिल नाठे, चंद्रभान मालुंजकर, चंद्रकांत शिंदे, किसनराव खताळे, सुनंदाताई जरांडे, छाया पाटील आदी उपस्थित होते.
कारगिलच्या युद्धामध्ये आपले दोन्ही पाय व एक हात गमावलेल्या मेजर दीपचंद नायक, माजी सैनिक विजय कातोरे, चंद्रभान मालुंजकर व चंद्रकांत शिंदे आदींसह माजी सैनिकांना गोदावरी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक जुनेद सलीम शेख यांनी, स्वागत संदीप भोजने यांनी केले. सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले.