शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

एप्रिल उजाडूनही टंचाई कामांना नाही मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST

नाशिक : एप्रिल महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमान ३९ अंशांपुढे गेले असले तरी अद्याप जिल्ह्यातील ...

नाशिक : एप्रिल महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमान ३९ अंशांपुढे गेले असले तरी अद्याप जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवून टँकरची मागणी झालेली नाही. परिणामी कृती आराखडादेखील कागदावरच राहिला आहे. आता उन्हाची तीव्रता वाढल्यास शेवटच्या आठवड्यात टँकरची मागणी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२०च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. तथापि, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाणी साठवणुकीची पुरेशी साधने नसल्याने या तालुक्यांमध्ये दरवर्षीच पाण्याची टंचाई भासते. त्याचबरोबर टंचाई पाचवीला पूजलेल्या बागलाण, नांदगाव, मालेगाव, देवळा या तालुक्यांना दरवर्षीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यंदा एप्रिल उजाडला तरी, अद्याप पाण्यासाठी फारशी ओरड नसली तरी, सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत नद्या, नाल्यांची पाणीपातळी कमी होऊन शेतकऱ्यांच्या विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचा हंगामही संपुष्टात येत असल्याने शेतीसाठी पाण्याची गरज जवळपास संपली आहे. मात्र, उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास महिना अखेरीस पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, उन्हाळ्यात ६०४ गावे व ७१८ वाड्या अशा प्रकारे एकूण १३२२ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यावर उपाययोजनासाठी अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. टंचाई कृती आराखड्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांतील एकाही कामाचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कृती आराखड्याचा तिसरा टप्पा सुरु झाला असून, त्यामुळे सध्या तरी आराखडा कागदावरच राहिला आहे.

-------

संभाव्य कामे प्रस्तावित

बोरअरवेलची दुरुस्ती होणार - ८

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावे - १३२२

बोअरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - २४४

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करणार - १४

नळयोजना पूर्ण करणार - ६५

--------

आराखड्यात होणार १४९५ कामे

टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४९५ कामे केली जाणार असून, त्यात प्रगतीपथावरील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळयोजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याची कामे केली जाणार असून, या उपरही पाणीटंचाईची समस्या दूर न झाल्यास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

-------

८६१ टॅँकरचे नियोजन

जिल्ह्यातील १३२२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून सर्व उपाययोजना राबवूनही ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत नाहीत, अशी ८६१ गावे, वाड्यांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे तसेच

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाहीत, अशा गावांमध्ये शेतकऱ्यांकडील खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यात १८५ गावे व ७५ वाड्यांमधील २६० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्या मोबदल्यात विहीरमालकाला मोबदला अदा करण्यात येणार आहे.