शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही ६७ हजार नागरिकांनी नाही घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST

नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे ...

नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे अजूनही सुरूच आहेत. कोविडच्या उद्रेकावर लसीकरणाचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. मात्र, अनेक नागरिकांनी पहिली लस घेतल्यानंतर कोरोना परत येणार नाही किंवा कोरोना गेल्याच्या अविर्भावात लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ केली आहे. किंवा मुदत उलटून गेल्यानंतर दुसरा डोस लवकर उपलब्ध न झाल्याचे निमित्त साधत जिल्ह्यातील ६७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेणेच टाळले असल्याचे दिसून येत आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याचे काम सुरू होते, दुसऱ्या डोसनंतर त्याला अधिक गती येते. त्यामुळे दोन्ही डोस घेणे आवश्यक असते. मात्र, अनेक नागरिकांनी पहिल्या डोसनंतर पुढील डोस टाळल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव पूर्णपणे टाळायचा असेल तर प्रत्येकास लसीच्या दोन डोसची आवश्यकता आहे. आरोग्यतज्ज्ञदेखील वेळोवेळी यावर जोर देत आहेत की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच आपण संसर्गापासून पूर्णपणे स्वत:चा बचाव करू शकतो.

इन्फो

दुसरा डोस तितकाच आवश्यक

प्रथम डोसदेखील खूप प्रभावी आहे यात काही शंकाच नाही; पण दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोसमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार असून, तो आपल्याला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचविण्यास उपयुक्त ठरतो.

इन्फो

नेमकी अडचण काय?

ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्या लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्याबरोबरच अनेक केंद्रांवर केवळ दुसरा डोसच उपलब्ध करून नागरिकांना प्राधान्य दिले जाते. मात्र, काही वेळा वेळेवर लस उपलब्ध नसते, कुठे संपते, तर कधी दुसऱ्या डोसचा निर्धारित कालावधी उलटून गेलेला असतो. तर काही नागरिक पहिला डोसच पुरेसा असल्याच्या भ्रमात राहात असल्याने त्यांनी दुसरा डोस टाळल्याचे दिसून येत आहे.