शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

मुदत संपूनही ६७ हजार नागरिकांनी नाही घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST

नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे ...

नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे अजूनही सुरूच आहेत. कोविडच्या उद्रेकावर लसीकरणाचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. मात्र, अनेक नागरिकांनी पहिली लस घेतल्यानंतर कोरोना परत येणार नाही किंवा कोरोना गेल्याच्या अविर्भावात लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ केली आहे. किंवा मुदत उलटून गेल्यानंतर दुसरा डोस लवकर उपलब्ध न झाल्याचे निमित्त साधत जिल्ह्यातील ६७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेणेच टाळले असल्याचे दिसून येत आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याचे काम सुरू होते, दुसऱ्या डोसनंतर त्याला अधिक गती येते. त्यामुळे दोन्ही डोस घेणे आवश्यक असते. मात्र, अनेक नागरिकांनी पहिल्या डोसनंतर पुढील डोस टाळल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव पूर्णपणे टाळायचा असेल तर प्रत्येकास लसीच्या दोन डोसची आवश्यकता आहे. आरोग्यतज्ज्ञदेखील वेळोवेळी यावर जोर देत आहेत की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच आपण संसर्गापासून पूर्णपणे स्वत:चा बचाव करू शकतो.

इन्फो

दुसरा डोस तितकाच आवश्यक

प्रथम डोसदेखील खूप प्रभावी आहे यात काही शंकाच नाही; पण दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोसमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार असून, तो आपल्याला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचविण्यास उपयुक्त ठरतो.

इन्फो

नेमकी अडचण काय?

ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्या लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्याबरोबरच अनेक केंद्रांवर केवळ दुसरा डोसच उपलब्ध करून नागरिकांना प्राधान्य दिले जाते. मात्र, काही वेळा वेळेवर लस उपलब्ध नसते, कुठे संपते, तर कधी दुसऱ्या डोसचा निर्धारित कालावधी उलटून गेलेला असतो. तर काही नागरिक पहिला डोसच पुरेसा असल्याच्या भ्रमात राहात असल्याने त्यांनी दुसरा डोस टाळल्याचे दिसून येत आहे.