शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही ६७ हजार नागरिकांनी नाही घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST

नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे ...

नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे अजूनही सुरूच आहेत. कोविडच्या उद्रेकावर लसीकरणाचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. मात्र, अनेक नागरिकांनी पहिली लस घेतल्यानंतर कोरोना परत येणार नाही किंवा कोरोना गेल्याच्या अविर्भावात लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ केली आहे. किंवा मुदत उलटून गेल्यानंतर दुसरा डोस लवकर उपलब्ध न झाल्याचे निमित्त साधत जिल्ह्यातील ६७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेणेच टाळले असल्याचे दिसून येत आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याचे काम सुरू होते, दुसऱ्या डोसनंतर त्याला अधिक गती येते. त्यामुळे दोन्ही डोस घेणे आवश्यक असते. मात्र, अनेक नागरिकांनी पहिल्या डोसनंतर पुढील डोस टाळल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव पूर्णपणे टाळायचा असेल तर प्रत्येकास लसीच्या दोन डोसची आवश्यकता आहे. आरोग्यतज्ज्ञदेखील वेळोवेळी यावर जोर देत आहेत की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच आपण संसर्गापासून पूर्णपणे स्वत:चा बचाव करू शकतो.

इन्फो

दुसरा डोस तितकाच आवश्यक

प्रथम डोसदेखील खूप प्रभावी आहे यात काही शंकाच नाही; पण दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोसमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार असून, तो आपल्याला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचविण्यास उपयुक्त ठरतो.

इन्फो

नेमकी अडचण काय?

ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्या लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्याबरोबरच अनेक केंद्रांवर केवळ दुसरा डोसच उपलब्ध करून नागरिकांना प्राधान्य दिले जाते. मात्र, काही वेळा वेळेवर लस उपलब्ध नसते, कुठे संपते, तर कधी दुसऱ्या डोसचा निर्धारित कालावधी उलटून गेलेला असतो. तर काही नागरिक पहिला डोसच पुरेसा असल्याच्या भ्रमात राहात असल्याने त्यांनी दुसरा डोस टाळल्याचे दिसून येत आहे.