शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना

By admin | Updated: March 9, 2017 01:23 IST

मालेगाव : तालुक्याच्या पूर्वभागातील सौंदाणेसह ११ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गिरणा उजवा कालवा पिण्याच्या पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मालेगाव : तालुक्याच्या पूर्वभागातील सौंदाणेसह ११ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गिरणा उजवा कालवा पिण्याच्या पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. पाणीप्रश्न शासनाशी तीव्र लढा देण्याचा निर्धार लाभ क्षेत्रातील ग्रामस्थांनी सौंदाणे येथे झालेल्या बैठकीत केला आहे.गिरणा उजवा कालव्याला पाणी आरक्षण देण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिल्यानंतर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची सौंदाणे येथील महादेव मंदिरात बैठक झाली. बैठकीत कृती समितीची स्थापना करण्यात आलीे. अध्यक्षस्थानी नांदगावचे उपसरपंच वामन सोनवणे होते. पंचायत समिती सभापती भरत पवार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभाग पाणी आरक्षण देण्यास नकार देत असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बैठकीत पंचायत समिती सभापती पवार, अक्षय पवार, टाकळीचे सरपंच समाधान शेवाळे, कौतिक सोनवणे, सौंदाणेचे उपसरपंच संदीप पवार आदिंनी पाणीप्रश्नी शासनाशी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभाग गिरणा- उजवा कालव्याला पाणी सोडत नसल्यामुळे व सौंदाणेंसह अकरा गावांचे पाणी आरक्षण मिळत नसल्यामुळे या भागातील पाणीप्रश्न भविष्यात पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात समितीचे अध्यक्षपदी पंकज गायकवाड, उपाध्यक्षपदी समाधान शेवाळे, संग्राम बच्छाव, संघटकपदी कौतिक सोनवणे, शिवाजी पवार, रमेश बच्छाव, सचिव भरत पवार, सहसचिव नितीन निकम यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)