शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

उत्खननप्रकरणी पाच सदस्यीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:15 IST

नाशिक : पर्यावरण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसाार उशिरा का होईना प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली असून सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील संतोषा, ...

नाशिक : पर्यावरण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसाार उशिरा का होईना प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली असून सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील संतोषा, भागडी येथील उत्खननाची स्थळ पाहणी करण्यासाठी अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. समितीबरोबरच ब्रह्मगिरी कृती समितीचे दोन सदस्य हे पाहणीप्रसंगी उपस्थित राहू शकणार आहेत.

गेल्या २४ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या दालनात ब्रह्मगिरी कृती समितीची त्र्यंबकेश्वर येथील उत्खननप्रकरणी बैठक पार पडली. सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील संताेषा, भागडी डोंगररांग व सारुळ गाव येथील उत्खननाबाबत ब्रह्मगिरी कृती समितीने आपली भूमिका मांडली. उत्खननामुळे पर्यावरण तसेच येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा दावा करीत या ठिकाणी अवाजवी तसेच बेकायदा उत्खनन सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या वेळी राज्यमंत्री बनसोड यांनी महसूल, वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, खनिकर्म विभाग यांनी या भागाची पाहणी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जिलेटिनचे स्फोट घडवून आणले जात असतील तर संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले होते.

मात्र, सात दिवसांचा कालावधी होऊनही याबाबत कोणतीही चौकशी होऊ शकली नाही. ज्या विभागांवर पाहणीची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यांच्याकडून अधिकाऱ्यांची नावेच दिली जात नसल्याने पुढील कार्यवाहीस विलंब झाला आणि त्यातच सात दिवसांचा कालावधीही संपुष्टात आला. त्यामुळे ब्रह्मगिरी कृती समितीच्या सदस्यांसह पर्यावरणप्रेमींमध्ये यंत्रणेविषयीची नाराजी पसरली होती. ही बाब त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणी तत्काळ समिती गठित केली.

या समितीमध्ये पश्चिम विभाग उपवनसंरक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची समिती नियुक्त केली आहे. ब्रह्मगिरी कृती समितीचे दोन सदस्य स्थळ पाहणीप्रसंगी उपस्थित राहतील, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. समितीच्या कामकाजाचे सनियंत्रण म्हणून पश्चिम विभाग उपवनसंरक्षक हे काम पाहणार आहेत.

--इन्फो--

समितीमधून नाराजीचा सूर

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये ब्रह्मगिरी कृती समितीच्या केवळ दोन सदस्यांना उपस्थितीत राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयी कृती समितीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पर्यावरण राज्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत समितीचे पाच सदस्य राहणार असल्याचे ठरले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र केवळ दोनच सदस्य मान्य केल्यामुळे ब्रह्मगिरी समितीच्या ग्रुपवर या प्रकरणी उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे.