शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

उद्योजक संघटनांतर्फे एव्हीएशन समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:13 IST

नाशिकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर येथे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू व्हावयास हवी, अन्यथा सुरू असलेले उद्योगही स्थलांतरित होतील. असे होऊ नये यासाठी नाशिकमधील औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन अनेक प्रश्न सुटावेत व नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी एव्हीएशन कमिटीची स्थापना करण्यात आली.

सिडको : नाशिकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर येथे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू व्हावयास हवी, अन्यथा सुरू असलेले उद्योगही स्थलांतरित होतील. असे होऊ नये यासाठी नाशिकमधील औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन अनेक प्रश्न सुटावेत व नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी एव्हीएशन कमिटीची स्थापना करण्यात आली.बुधवारी (दि. १८) आयमा रिक्रिएशन सेंटर येथील के. आर. बूब कॉन्फरन्स सभागृहात झालेल्या बैठकीत व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे मनीष रावल, नाशिक सिटिझन फोरमचे आशिष कटारिया, निटाचे अध्यक्ष अरविंद महापात्रा होते. यात आयमा, निमा, महाराष्ट्र चेंबर, निटा, नाशिक सिटिझन फोरम व इतर संघटना सहभागी होणार आहेत.आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी सांगितले की, नाशिकचा सर्वांगीण विकास सुरळीत व दररोज विमानसेवा नसल्यामुळेच थांबलेला आहे. उडान सेवेअंतर्गत विमानसेवा विकसित होणार होती पण झाली नाही, त्यामुळे नाशिकचा विकास झाला नाही. उडान सेवेअंतर्गत हा विकास होणार होता तो विकास का झाला नाही याचाही खुलासा झाला पाहिजे, असे प्रतिपादन आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी केले.यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष सल्लागार समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी, ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राजकीय वर्ग प्रयत्नशील आहे, तर प्रशासकीय यंत्रणेचा अभाव असल्याचे सांगितले. नाशिक सिटिझन फोरमचे आशिष कटारिया यांनीही नाशिकच्या विकासासाठी विमानसेवा अत्यावश्यक असल्याचे सांगितले.निमाचे मनीष रावल यांनी उडान सेवेअंतर्गत आम आदमी विमानसेवेद्वारा उद्योग, व्यवसायासाठी जोडले जाणार होते पण तसे झाले नाही. विमान कंपन्या पाहणी करून जातात पण सुरळीत सेवा देत नाहीत, असे सांगितले.यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी नाशिकचा औद्योगिक विकास विमानसेवा सुरळीत नसल्याने रखडलेला आहे. यासाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याचे व या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. यावेळी आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, राजेंद्र पानसरे, योगीता आहेर, उन्मेष कुलकर्णी, नीलिमा पाटील, विजय जोशी, गोविंद झा उपस्थित होते.नाइट लँडिंग सेवा सुरू झाल्यामुळे आता तरी देशात व परदेशात उडानमार्फत सुरळीत विमानसेवा विमान कंपन्यांनी द्यावी. नाहीतर वेळप्रसंगी नियमित विमानसेवा मिळण्यासाठी आंदोलनही करण्यात येईल, असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. नाशिकचा आयटी विकास साधायचा असेल तर विमानसेवा फार महत्त्वाची आहे. विमानसेवा सुरळीत नसल्यामुळे नाशिक आयटी क्षेत्रात पुढे गेले नाही, अशी खंत नीटचे अध्यक्ष अरविंद महापात्रा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AirportविमानतळMIDCएमआयडीसी