शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सेंट्रल किचन कामकाजात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:28 IST

सव्वा लाख मुलांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारासंदर्भात नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी अनेक नियमांचे पालनच केले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या भेटीत आढळल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात अधिकाºयांच्या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत तो आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देआयुक्तांना दोन दिवसांत अहवाल : अचानक भेटीतील प्रारंभिक निष्कर्ष

नाशिक : शहरातील सव्वा लाख मुलांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारासंदर्भात नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी अनेक नियमांचे पालनच केले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या भेटीत आढळल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात अधिकाºयांच्या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत तो आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला जाणार आहे.शासनाच्या आदेशाने महापालिकेने १ लाख २० हजार मुलांसाठी नियुक्त केलेल्या १३ ठेकेदारांबाबत महासभेत जोरदार चर्चा झाली होती आणि ठेके दिल्यानंतर नियम धाब्यावर बसवून कामकाज केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सात जानेवारीस भल्या पहाटे तेरा पथके सेंट्रल किचनच्या विविध ठिकाणी अन्न शिजवणारे तसेच शाळांमध्ये पाठवून नियमांचे पालन कितपत होते, याची तपासणी केली होती. विशेष म्हणजे महापालिकेचेच नव्हे तर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीदेखील सहभागी करून घेण्यात आले होते.अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीत अन्न पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभावहोता.अन्न शिजवले जाते त्याठिकाणी स्वच्छतेचे तसेच अन्नसुरक्षेचे निकष पाळले गेले नसल्याचेदेखील पथकाला आढळल्याचे वृत्त आहे. या सेंट्रल किचनमध्ये शिजवलेले भोजन हे हवाबंद डब्यातून तसेच अन्न व औषध प्रशासनाचा अन्न वाहतुकीचा परवाना असलेल्या वाहनातूनच नेण्याची सक्ती आहे, परंतु हा निकष पाळला गेला नसल्याचेदेखील आढळले आहे.अन्न व औषध विभागाकडे नोंदवलेल्या वाहनातूनच पुरवठा करणे आवश्यक असताना अन्य वाहनातून पुरवठा सुरू होता, असे आढळले असल्याचे समजते. अनेक ठिकाणी तांदूळ सुस्थितीत व सुरक्षित ठेवला गेलेला नव्हता. नगरसेवकांच्या तक्रारींपेक्षा प्रशासनाने बघितलेल्या त्रुटींबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.स्थायी समितीचा अहवाल लवकरचमहापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतदेखील पोषण आहारावर वादळी चर्चा झाली होती त्यानंतर या समितीने नियुक्त केलेल्या चौकशी पथकाने काही ठेक्यांची तसेच शाळेत जाऊन अन्न कसे पुरवले जाते याची तपासणी केली होती. या पथकाचा अहवाल येत्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे वृत्त आहे. ंराज्य शासनाने मुळातच बचत गटांचे काम हिरावून घेऊन सेंट्रल किचनसाठी वेगळे निकष ठरवून ठेकेदार नियुक्त केले. त्यासाठी अनेक नियम निकष स्थानिक पातळीवर बदलण्यात आले आहेत. त्यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. त्याचा अहवाल प्राप्त होण्याच्या आतच महासभेत या विषयावरून गदारोळ झाला.ठेके देताना अनियमितता झालीच, परंतु त्यानंतर मध्यान्ह भोजन पुरवतानादेखील गोंधळ असून, हा मुलांच्या जीवनाशी खेळ असल्याने सर्व ठेके रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणेच बचत गटांना काम देण्यात यावे, असा ठराव महासभेने केला आहे. त्या आधी आता आयुक्तांच्या चौकशी अहवालाच्या आधारे का निर्णय घेतला जातो हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :foodअन्न