शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

भ्रष्टाचाराचे निर्मूलन की, तक्रारदारांचे आख्यान

By admin | Updated: December 18, 2014 22:48 IST

चुकीचा पायंडा : राज्य सरकारच्या नावे अधिकाऱ्यांना धमकी; ब्लॅकमेल करण्याचा प्रकार

नाशिक : चार महिन्यांपूर्वी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कथित अशासकीय सदस्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला नायब तहसीलदाराशी केलेल्या गैरवर्तनानंतर समितीच्या बैठकीत तक्रारदारांना थारा न देण्याचा निर्णय झालेला असतानाही सोमवारी संबंधित व्यक्तीला समितीच्या बैठकीत पाचारण करून त्याला शासकीय अधिकाऱ्यांकडून ठायीठायी केल्या जाणाऱ्या कथित भ्रष्टाचाराचे आख्यान ऐकण्याची मुभा शासनाच्या मुखियानेच दिल्याची बाब समस्त यंत्रणेच्या जिव्हारी लागली आहे. त्यातूनच एका अधिकाऱ्याने तक्रारदाराला खडे बोल सुनावतानाच, शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार बैठकीतील उपस्थित अधिकारी सहन कसे करतात असा सवाल करून घरचा अहेरही दिल्याची चर्चा होऊ लागली आहे. जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे शासकीय पातळीवरील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे दाखल करण्याचे व त्यामागे काही विशिष्ट व्यक्तींचा विशिष्ट हेतू असल्याची बाब लपून राहिलेली नाही. त्यातही काही व्यक्तींकडून अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करून नंतर संबंधित अधिकाऱ्याशी झालेले ‘साटेलोटे’ पाहता, समितीपुढे सुनावणीसाठी आलेले प्रकरणे मागे घेण्याचेही प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे समितीवर वरचष्मा ठेवू पाहणाऱ्या काही व्यक्ती कालांतराने या समितीच्या बैठकांना अशासकीय सदस्य म्हणून बेकायदेशीरपणे उपस्थित राहून शासकीय यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट झाली. परिणामी अशासकीय सदस्यांखेरीज भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत अन्य दुसऱ्या व्यक्तीस वा तक्रारदारासही बसू न देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी घेतला. मात्र सोमवारी झालेल्या समितीच्या बैठकीत थेट तक्रारदारांवर मेहेरबानी दाखवित, त्यांना मानाचे पान देण्याचा पवित्रा बैठकीच्या अध्यक्षांनी घेतला परिणामी तक्रारदाराने शासकीय खात्यांमध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचाराला उपस्थित शासकीय अधिकारीच कसे जबाबदार आहेत, याचे व्याख्यानच देण्यास सुरुवात केली. ज्या तक्रारीशी तक्रारदाराचा संबंध नाही, अशा प्रकरणांमध्येही त्याने उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केल्याने बैठकीचे वातावरण तप्त झाले. परंतु तक्रारदार करीत असलेले आरोप जणू काही मान्य आहेत, अशा अवस्थेत खाली माना घालून ऐकण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. मात्र त्यापैकी एकाने आपला स्वाभिमान जपत, थेट तक्रारदारालाच धारेवर धरून विषय व तक्रारीपुरतेच बोलण्याची समज दिली. शासकीय बैठकांना उपस्थित राहून काही व्यक्ती अधिकाऱ्यांवर दबाव व ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार केली. त्यावर तक्रारदाराला चाप बसला असला तरी, त्याला बैठकीत बोलविण्यामागच्या हेतुचीही चर्चा होऊ लागली आहे.