शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’

By admin | Updated: April 13, 2015 01:48 IST

‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’

नाशिक : दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, कठीण प्रसंगांना तोंड देण्याची जिद्द असेल, तर यशाला गाठू शकतो, या विचारातून काम करीत राहिल्यानेच मेळघाटातील कुपोषणासारख्या समस्येची तीव्रता कमी करता आली, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष सातव यांनी केले. भारत ज्ञान विज्ञान समितीच्या वतीने महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक येथे डॉ. सातव यांचे व्याख्यान झाले. डॉ. सातव हे वीस वर्षांपासून मेळघाटातील धारणी परिसरात कोरकू आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. त्यांनी ‘मेळघाटातील कुपोषण निर्मूलन’ या विषयावर बोलताना आपल्या कार्याचा पट उलगडून दाखवला. ते म्हणाले, मेळघाट हा अद्यापही दुर्लक्षित भूभाग असून, तेथील आदिवासींमध्ये आजारांचे प्रमाण अजूनही मोठे आहे. आपण चंद्र-मंगळावर पोहोचलो असलो, तरी आदिवासींना मात्र साध्या आजारांवर उपचार मिळत नाहीत. कुपोषणामुळे मुले मृत्युमुखी पडतात. मेळघाटात आजही ६० टक्के प्रसूती घरात होते. त्यामुळे तेथे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. स्वत:चा आनंद शोधण्यासाठी मेळघाटात एका झोपडीत काम सुरू केले. सुरुवातीला लोक येत नव्हते. त्यामुळे गावोगावी शिबिरे घेऊ लागलो. अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. पत्नी डॉ. कविता ही डोळ्यांची सर्जन असल्याने तिची मदत झाल्याचे डॉ. सातव म्हणाले. वासंती सोर अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. जयप्रकाश म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव हुदलीकर, प्रा. मिलिंद वाघ व कार्यकर्ते उपस्थित होते.