शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वृक्षलागवडीने पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता

By admin | Updated: June 5, 2016 22:23 IST

हुतात्मा स्मारक : चर्चासत्रातील सूर

नाशिक : वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्जन्यमान कमी होऊन भीषण दुष्काळासारख्या समस्यांचा सामना करावा लागत असतानाही अनेक सुशिक्षित कुटुंबे आपल्या घरासमोर झाड नको म्हणतात. त्यामुळे दिवसेंदिवस वृक्षांची संख्या घटत असल्याने ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात उमटला. भारतीय माजी सैनिक संघटना, पर्यावरण संतुलन संस्था व स्वातंत्र्य सैनिक संघटना यांनी संयुक्तरीत्या रविवारी (दि.५) हुतात्मा स्मारक येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष फुलचंद पाटील, पर्यावरण संतुलन संस्थेचे अध्यक्ष रमेश कडलक, सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर, स्वातंत्र्यसैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष पंडित येलमामे व सुरेश जैन आदि मान्यवरांनी त्यांचे मत मांडले. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व विशद करताना चंद्रकांत लासुरे यांनी पक्षांसाठी पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पंडित येलमामे यांनी वृक्षलागवड व संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. ज. रा. पाटील यांनी पर्यावरणाविषयी कविता सादर केली. ग्लोबल वार्मिंग, वाढलेले प्रदूषण, प्रचंड वृक्षतोडीमुळे घटलेले पर्जन्यमान व खालवलेली भूगर्भजल पातळी यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे पां. भा. करंजकर यांनी सांगितले. प्रा. यशवंत पाटील यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ या अभंगाच्या आधारे पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष विजय पवार, सचिव मेघश्याम सोनवणे, सहसचिव पी. यू. चौधरी, डॉ. साहेबराव कासव, चंद्रशेखर कांबळे, प्रकाश मेधने, सोपान मुसळे, अ‍ॅड. शिवाजी शिवर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)