नाशिक : केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग व उद्योगवर्धिनी संस्था यांच्या वतीने आयोजित दोनदिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेचा समारोप आज झाला. यावेळी प्रथितयश उद्योजकांनी विद्यार्थ्यांना उद्यमशीलतेचे धडे देत त्यांना प्रोत्साहित केले. कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यशाळेत सकाळच्या सत्रात बॅँक आॅफ महाराष्ट्रचे अंकुर शर्मा, सी. डी. सिंग, एनएसकेचे कृष्ण मोहन व विजय शिवदास सहभागी झाले होते. त्यानंतर ‘गोल सेटिंग’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात हेमंत पाटील, उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, डॉ. उदय वाड, रवींद्र झोपे, विक्रांत उगले व अभिजित खत्री यांनी अनुभव कथन केले. दरम्यान, प्रशिक्षणात सहभागी झालेल्या संदीप फाउण्डेशनच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी, तर प्रास्ताविक अभिजित खत्री यांनी केले. (प्रतिनिधी)
उद्योजकांनी दिले उद्यमशीलतेचे धडे
By admin | Updated: July 5, 2014 00:16 IST