शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

मुक्त विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत होणार

By admin | Updated: July 7, 2017 18:01 IST

नियमित व पारंपरिक शिक्षणाचे वय निघून गेल्यानंतर अनेकांना नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना विशिष्ट शिक्षणाची गरज भासते.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नियमित व पारंपरिक शिक्षणाचे वय निघून गेल्यानंतर अनेकांना नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना विशिष्ट शिक्षणाची गरज भासते. अशावेळी पारंपरिक विद्यापीठातून शिक्षण घेणे शक्य होत नाही, तर मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेताना प्रवेशप्रक्रियेच्या काळात प्रवेश मिळाला नाही तर त्यांचे वर्ष वाया जाते. तसेच बारावीच्या पुनर्परीक्षार्थींनाही प्रवेश मिळावा, यासाठी मुक्त विद्यापीठासमोर शैक्षणिक वर्षात वर्षातून दोनदा प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, येत्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत वायुनंदन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय्य साकारण्यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रा. ई. वायुनंदन यांनी सांगितले. दहावी, बारावी किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना मानव्य विद्या व सामाजिकशास्त्र विभागात प्रमाणपत्र, पूर्वतयारी शिक्षणक्रमासह विद्यापीठात उपलब्ध १०७ विषयांसाठी प्रवेश घेता येणार आहे.