शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अतिक्रमण हटावला दोन दिवस विश्रांती

By admin | Updated: January 22, 2015 00:53 IST

नागरिकांना आवाहन : रेड मार्किंगचे काम युद्धपातळीवर

नाशिक : महापालिकेने सोमवारपासून पुन्हा एकदा अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केल्यानंतर व्यावसायिक व नागरिकांनी चांगलाच धसका घेतला असून, स्वत:हून अतिक्रमित बांधकाम काढून घेतले जात आहे. दरम्यान, नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांना आणखी मुदत मिळावी म्हणून महापालिकेने दोन दिवसांसाठी मोहीम थांबविली असून, रेड मार्किंगचे काम मात्र युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.मनपाने गंगापूररोड व पेठरोड याठिकाणी मोहीम राबविल्यानंतर आयुक्तांनी आठ दिवसांसाठी मोहीम थांबवत नागरिक व व्यावसायिकांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळत शहरात ठिकठिकाणी रहिवाशांसह व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमित बांधकाम हटविले होते. दरम्यान, आयुक्तांनी दिलेला कालावधी संपल्यानंतर पुन्हा एकदा गेल्या सोमवारपासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पाथर्डी फाटा ते साईनाथनगर चौफुली दरम्यानच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा पडला. एकीकडे पालिकेची मोहीम सुरू असतानाच, अनेक व्यावसायिकांनी स्वत:हून बांधकामे हटविली. नागरिक व व्यावसायिकांकडून स्वत:हून प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना आणखी मुदत मिळावी म्हणून दोन दिवस मोहीम थांबविण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला आहे. मंगळवारी महापालिकेची महासभा असल्याने मोहिमेला विश्रांती देण्यात आली होती. (प्रतिनिधी)