शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये साडेतीनशे धार्मिक स्थळांची अतिक्रमणे

By admin | Updated: January 11, 2015 00:13 IST

कारवाईचा प्रश्न : तणावामुळे महापालिकेची तलवार म्यान

नाशिक : शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी महापालिकेने अगोदरच या संदर्भात माहिती संकलित केली आहे. शहरात सुमारे साडेतीनशे विविध धार्मिक स्थळांचे अतिक्रमणे आहेत; परंतु ती पाडायची कशी असा प्रश्न पालिकेसमोर आहे. तथापि, आता न्यायालयानेच आदेश दिल्याने पालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.कोणत्याही प्रकारची बांधकामे करताना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु शहरात धार्मिक स्थळे बांधकाम करताना मात्र कोणत्याही प्रकारे बांधकामे करता येत नाही. त्यासंदर्भात भगवानजी रियानी यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केल्यानंतर यासंदर्भात सुनावणी झाली. आता चार आठवड्यांत राज्यातील सर्व शहरात पदपथांच्या किनाऱ्यावर असलेली धार्मिक अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे आता कारवाई अटळ मानली जात आहे. राज्यशासनाने धार्मिक अतिक्रमणांना प्रतिबंध घालण्यासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी आदेश दिले होते. त्यानुसार शहरी भागात महापालिका आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. नाशिक महापालिकेत आयुक्तपदी भास्कर सानप असताना समिती गठीत करण्यात आली. यात पोलीस आयुक्त, नगररचना अधिकारी तसेच अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. महापालिकेने त्याचवेळी १९९५ पूर्वीची अनधिकृत धार्मिक अतिक्रमणे आणि त्यानंतरच्या कालावधीत झालेली अतिक्रमणे वा अनधिकृत बांधकामे यांची यादीच तयार केली होती. त्यानुसार सर्वधर्मीयांची मिळून सुमारे साडेतीनशे धार्मिक अतिक्रमणे असल्याची माहिती नगरचना विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अतिक्रमणांचा सर्व्हे झाला; परंतु त्यानंतर मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कारवाई केल्यास धार्मिक भावना दुखावतील, त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो या भीतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समजते. तथापि, आता न्यायालयाने चार आठवड्यात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महापालिकेला अद्याप आदेश प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)