शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

प्रथम पसंती क्रमापेक्षा ८९० अतिरिक्त विद्यार्थ्यांचे अकरावीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : महापालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकारावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरीत मंगळवारी ...

नाशिक : महापालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकारावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरीत मंगळवारी (दि. ३१) सायंकाळपर्यंत ८ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत ७ हजार ९८८ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेले असताना तब्बल ८९० अतिरिक्त जागांवर प्रवेश निश्चित झाल्याने विद्यार्थ्यांचा यावर्षी पहिल्या फेरीपासूनच द्वितीय पसंती क्रमाच्या महाविद्यालयांमध्येही प्रवेशाकडे कल असल्याचे दिसून येत आहे.

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याची सोमवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेवटची मुदत होती परंतु पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांचा तांत्रिक घोळ उडाल्याने तसेच प्रवेश प्रक्रियेपासून पात्र उमेदवार वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ दिली होती. ही मुदत मंगळवारी सायंकाळी संपली असून अकरावीत आतापर्यंत ८ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. त्यामुळे दरवर्षी पहिल्या फेरीपासूनच पूर्ण क्षमतेने प्रवेश होत नसल्याने रेंगाळणारी प्रवेश प्रक्रिया यावर्षी लवकरत पूर्ण जागांवर प्रवेश निश्चित होऊन पूर्ण होण्याचे संकेत निर्माण झाले आहे.

अकरावी प्रवेशाची स्थिती

कनिष्ठ महाविद्यालये - ६०

उपलब्ध जागा - २५,३८०

एकूण अर्ज - २३,१५८

अर्जांची पडताळणी -२०,९००

पर्याय निवडले -१६,७५२

प्रवेश निश्चित - ८८७८

रिक्त जागा -१६५०२